Thursday 30 July 2015

।। गुरुपोर्णिमा ।।

।। श्रीगुरु ।।

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः|
गुरुः साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ||

उद्या निज आषाढ पौर्णिमा(३१/७/१५) म्हणजे "व्यास पौर्णिमा"! अर्थात "गुरुपौर्णिमा" !! गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस! ह्या दिवशी शिष्यांचे मुख्य कर्तव्य म्हणजे "गुरु-दर्शन,गुरु-पूजन,गुरु-तीर्थप्राशन,गुरु-उपदेशग्रहण"! भारतीय संस्कृतीमध्ये ह्या दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपुजनाची परंपरा दैवी गुरूंच्या परंपरेतून निर्माण झाली.ही परंपरा साक्षात भगवान शंकरांनी निर्माण केली.त्यामुळे या परंपरेला "गुरुपुजनाचा" अधिकार आला आहे.
आपले हे स्थान "गुरुपरंपरेतील" एक स्थान आहे. ज्यांच्या ठिकाणी श्रद्धा आहे,भक्तीभाव आहे,सेवा,उपासना आहे,त्यांच्या जीवनामध्ये निर्धास्तपणा नक्कीच येतो.
गुरुपौर्णिमेचा दिवस म्हणजे गुरुंचे पूर्णत्व पाहण्याचा दिवस! गुरूंना "पूर्णत्व" कशामुळे येते तर गुरु स्वतःच्या गुरूंकडून आलेला उपदेश लोकांपर्यंत पोहोचवतात,या उपदेशाच्या परम्पार्तून परमार्थ साधतात.तेव्हा या पूर्णत्वाला शरण जाण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा!जे दुसऱ्यांना ज्ञान देऊ शकतात,शिकवू शकतात अशा परंपरेतील जे पुरुष आहेत त्यांची सेवा करण्याचा हा दिवस!आजची ही पौर्णिमा व्यास पौर्णिमा म्हंटली जाते.व्यास ऋषींनी स्वतःच्या अनुभवावरून सामान्य माणसाला सुद्धा अनुभव मिळावा म्हणून स्वतः गुरुपुजनाला सुरुवात केली.
गुरुपौर्णिमेनिमित्त शिष्यांचे मुख्य कर्तव्य म्हणजे गुरु-दर्शन,गुरु-पूजन,गुरु-तीर्थप्राशन,गुरु-उपदेशग्रहण!गुरुपूजन करताना मनात अत्यंत पावित्र्याची भावना असली पाहिजे.तुम्ही हा विचार केला पाहिजे,कि आपल्याला जास्तीत जास्त गुरुसहवास कसा घेता येईल?दोन शब्द ऐकून समाधान कसे मिळवता येईल?आजचा जो दिवस आहे तो गुरुदर्शनापेक्षा सुद्धा "गुरुभेटीचा दिवस" असतो.ज्या भक्तांच्या मनात अशी सतत भावना असते कि हा दिवस कधी येतो आणि त्या चरणांना मी स्पर्श करतो!अशा शिष्यांची पापे खरोखरच नाहीशी होतात.
आजच्या दिवसाचे महत्व म्हणजे प्रत्येकाने एक नियम करायचा असतो आणि तो नियम निरंतर कसा टिकवता येईल याची प्रत्येकाने काळजी घ्यायची असते.आपल्या ठिकाणी असलेले दोष,गुरुपूजनाच्या वेळी म्हणजे चरणांवर डोके ठेवताना कसे कमी होतील याचा विचार केला पाहिजे.प्रत्येक गुरुपौर्णिमेला एक एक दोष कमी करण्याचा निश्चय करून तो अमलात आणला असता बारा वर्षानंतर तुम्हाला स्वतःमधील बदल जाणवू लागेल!

अज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया |
चक्षुरुन्मीलितं येन,तस्मै श्रीगुरवे नमः||

(अज्ञानरूपी काळोखाने ज्याला अंधपणा आलेला आहे,त्याचे नेत्र,ज्ञानाचे अंजन ही शलाका,तिने ज्यांनी उघडले त्या श्रीगुरूंना नमस्कार असो.)
संदर्भ- श्रीरामकृष्ण उवाच         

श्रीगुरु महंत प्रमोद महाराज जगताप यांच्या मुळे मी घडलो त्यांच्या चरणांना त्रिवार साष्टांग दंडवत !

वारकरी संप्रदाय युवा मंच, महाराष्ट्र

भारतरत्न डॉ ए.पी.जे.अब्दुलजी कलाम सर यांस भावपूर्ण श्रद्धांजली !