Tuesday 7 June 2016

श्रीगुरू गुंडामहाराज संस्थान - देगलूर / पंढरपूर दिंडी सोहळा

नीतीच्या तीन गोष्टी !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।

प्रश्न साधकांचे उत्तरे श्रीमहाराजांची

नीतीच्या तीन गोष्टी

भक्त :  " नीतीने राहवे म्हणजे कसे ? "
श्रीमहाराज : नीतीच्या मुख्य तीन गोष्टी लक्षात ठेवाव्यात . एक म्हणजे एक पत्नीव्रत असावं , त्याला प्राणपलीकडे सांभाळाव . धर्माची बंधने प्राणाशी गाठ आल्यावर सोडली तर चालतात . एक अगदी कर्मठ ब्राह्मण होता. तो बेशुद्ध पडला. त्याला डॉक्टरने थोडी दारू पाजली हे चालेल ; पण नीती प्राण गेला तरी जपली पाहिजे . दुसरी गोष्ट म्हणजे पैशाचा लोभ न धरावा. पैसा खूप अनर्थांना कारण आहे. आपल्या श्रमाने मिळणार पैसा खरा. बाकीच्याचा लोभ धरू नये .आणि पैशा मुळे मी सुखी आहे , असे मनात चुकून सुद्धा आणू नये . तिसरी गोष्ट म्हणजे कोणाचेही वाईट चिंतू नये. सर्वांच कल्याण व्हावं , म्हणावं कोणाचे अंतःकरण दुखवू नये. घरातील अगदी कुत्र्याहीसुद्धा वाईट वागू नये.दुसरा आपल्याशी जसा वागावासा वाटतो तस आपण दुसऱ्याशी वागावं ; हीच नीती एवढं जो करेल ना , त्याला भगवंत लांब नाही . आपल्या कर्तव्यात राहावं आणि त्यात त्याची आठवण ठेवावी हे अगदी सगळ्याच सार आहे.

Varkariyuva.blogspot.in