Saturday 31 May 2014

निषेध ! निषेध ! निषेध ! - अक्षय भोसले

निषेध ! निषेध ! निषेध!



आम्ही वारकरी आहोत मात्र स्वराज्याचे धारकरी सुद्धा आहोत ! 
भले तर देऊ कासेची लंगोटी , नाठालाच्या माथी हनु काठी ..आता काठीने भागनार नाही यांना मुळासकट नष्ट केल पाहिजे .
एक वेळ स्व ता चा खुन माफ करु पण छत्रपतीँचा आणि हिंदु देवतांचा अपमान करणाय्राला मुळासकट साफ करु..
लाखो करोडो लोँकांच्या ह्रदयावर आधिराज्य गाजवणाय्रा छत्रपती शिवराय,छत्रपती शंभुराजे व बाळासाहेब ठाकरे यांचे अश्लिल छाया चित्र बनवून टाकणाय्रांचा जाहिर निषेध !
पण ज्या कोणी हरामखोरांने हे कृत्य केले आहे त्याला तमाम हिंदूस्थानातील हिंदुची एकी काय असते हे येणाय्रा काळात बघायला मिळेल.
त्या पेज वरील हिंदु देवतांचे व महाराजांचे Photoshop करुन जे फोटो टाकलेत ते पाहुन वाईट वाटल पण हेच Photo देखिल बर्याच लोकांनी Like केलेत आणि ते मराठी आहेत हे पाहून तळपायाची आग मस्तकात जातेय.
आता लोक त्या पेज ची लिँक सर्वत्र पसरवत आहेत पेज बंद व्हावी हा त्यांचा हेतु झाला पण हे सर्व आगीत तेल ओतण्यासारखच आहे. कृपया भावना भडकवु नका.
बघू आता सरकार काय याला उत्तर देत नाहीतर आम्ही आहोतच सक्षम याकरिता !
कुठे गेली आपली media कोण कोणासोबत पळून गेल , कोणाचे कोणाशी संबंध , अरे अशा फालतू गोष्टी दाखवता मात्र माझ्या शिवबांचा झालेला अपमान पाहून शांत बसता लाजा कशा वाटत नाही ..बांगड्या भरा हातात तुम्ही आणि मिरवा ...निषेध ! निषेध ! निषेध !
जय शिवराय !
जय शंभुराजे!
जयस्तु हिँदुराष्ट्र !
जय वारकरी !
तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय – वारकरी संप्रदाय ( लेखक - अक्षय भोसले )

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
सर्वधर्म समभावाची शिकवण देणारा जगाच्या पाठीवर एकमेव संप्रदाय – वारकरी संप्रदाय

माझे तुकोबाराय म्हणतात कि ,
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।
भेदाभेदभ्रम अमंगळ ॥१॥
आइका जी तुम्ही भक्तं भागवत ।
कराल तें हीत सत्य करा ॥२॥
कोण्या ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥३॥
तुका म्हणे एका देहाचे अवयव ।
सुख-दुःख जीव भोग पावे ॥४॥
वारकरी संप्रदायत सर्व धर्माचे संत होऊन गेलेत आणि भाविक  भक्तजन यांची मांदियाळी आहे . आपण पहा न आमच्या माऊली या ब्राह्मण समजाच्या आहेत  तर आमचे श्री संत तुकाराम महाराज हे बहुजन समाजाचे चोखोबा राया हरिजन समाजाचे होते , सावता महाराज हे माळी समाजाचे , नामदेव महाराज शिंपी समाजाचे  , सेना महाराज नाभिक समाजाचे , संत नरहरी महाराज सोनार समाजाचे इतकच नव्हे तर मुस्लीम समाजाचे कबीर जी आमच्या संप्रदायात आहेत आणि असे कित्येक नाव सांगता येतील . महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण भारत भर संतानी यात्रा केली या भगवत ध्र्माकॅह प्रचार केला व सर्वाना एकत्रित केल .आपण आज म्हणतो कि सर्व समाजाने एकत्र आले पाहिजे मात्र हे कार्य १२ शतकापासून आमचे साधू संत करत आलेत आणि आजतागायत अविरत सुरु आहे .
आजच सरकार म्हणत कि स्त्री शिक्षण स्त्रियांना समाजात माण सन्मान दिला पाहिजे . मात्र आपल्या माहितीकरिता समाजात सध्या ज्या स्त्रिया वेश्या व्यवसाय करतात त्यांना आता काय किमत आहे पण आमच्या कान्होपत्र अशा कुळात जन्माला येऊन हि संत या पदाला जाऊन पोहचल्या हि क्रांती केवळ वारकरी संप्रदायच करू शकला . संप्रदायात तेव्हा पासून आज पर्यंत आणि पुढे स्त्रियांना मंच स्थान आहे याच मूर्तिमंत उदाहरण आमच्या चिमुकल्या मुक्ताई , सोयराबाई , जनाबाई , भगीरथी जी , बहिणाबाई कित्येक नाव आपल्या डोळ्यांसमोर येतील .आमचा भगवंत यांची भक्ती पाहून यांच्या सोबत काम करयचा इतका मोठा स्त्रियांना माण सन्मान केवळ वारकरी संप्रदायच देऊ शकला आज तागायत . आज नोकरवर्गास काय किमत देतात वरिष्ठ मात्र आमचे गावबा जे कि काम करण्याकरिता नाथमहाराजांच्या घरी राहिले पडेल ते काम केल व अखेर संत या पदाला जाऊन  पोहचले .
आदरणीय गुरुवर्य प्रमोद महाराज  यांच्याशी बोलताना त्यांनी त्यांच्या जीवनातील एक गोष्ट सांगताना पूजनीय दादा महाराजंचा ( ह.भ.प. दादा महाराज सातारकर ) उलेख्ख केला ते नेहमी सांगयचे समर्थाचिया भोजने | तळलिया वोळलिया एकची पक्वान्ने || जस कि एखादा श्रीमंत मानूस आणि उदारही   आहे त्याच्या कडे कधी भोजनाची पंगत असेल न तर त्यांच्या  घरातल्यांना हि त्या दिवशी तेच अन्न आणि बाहेरील गोर गरीब जन माणसाना हि तेच अन्न अर्थात भेद भाव नाही .
माऊली म्हणतात,
‘‘या रे या रे लहान थोर
याती भलते नारी नर
न करावा लागे विचार अन्यथा’’
अर्थात, लहान-थोर, उच्च-नीच, वरिष्ठ-कनिष्ठ, स्त्री-पुरुष, तुम्ही कुणीही असा, सगळ्यांनी या आणि सामील व्हा!
तुकोबा म्हणतात,
तुका म्हणे नाही जातीसवे काम
ज्याचे मुखी नाम तोची धन्य!
तुकोबा-ज्ञानोबांचे हे विचारच आपल्याला भविष्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत, याची मला खात्री आहे.
आणि अगदी तसच एक ठिकाणी समर्थ म्हणतात ना , मऱ्हाटा / मराठा  तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा !
मराठा म्हणजे केवळ मराठा जात नव्हे तर त्यात येतात त्या सर्व १८ पगड जाती धर्म सर्वांचा समावेश आणि याच शिकवणीने पुढे साकरल गेल ते शिवराज्य आणि आपल स्वराज्य ..म्हणजे यात हि वारकरी संप्रदाय तथा साधू संत यांचे आशीर्वाद मार्गदर्शन होतच . आणि आज राम राज्य तर आहे सुराज्य तर आहे मात्र त्यातील शांतता स्त्रियांना असणारा माण सन्मान वर वर पाहता दिसत आहे सगळ ठीक मात्र अस नसून अजून हि काही वाईट प्रवृत्तीने आमचा युवा वर्ग मग ते व्यसन दारूचे असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीच माझी सर्व मातृ वर्गास विनंती आहे कि आता पासून आपल्या मुलांनावर संस्कार करा मला माहीत आहे कि या गोष्टी सांगण्याची गरज नाही आईला कोणत्या हि कारण “लेकुराचे हित वाहे माउलीचे चित्त ”मात्र मुल बिघडतात ती  संगतीने आणी जर असू घडू द्यायचे नसेल आपल्या मुलांनी आमच्या माऊली ,  तुकाराम महाराज ,  शिवाजी राजांच्या प्रमाणे , स्वामी विवेकानंद घडवायचेत तर त्यांच्या हातात श्रीमद भगवत गीता , ज्ञानेश्वरी , रामायण , श्री गाथा , दासबोध आदी ग्रंथ द्या , आणि हे जर सुजनवाक्य चांगले विचार सदोदित जवळ राहिले तर नक्कीच राम राज्य आल म्हणून समझा पण परिवर्तनाची गरज आपल्या स्वत : पासून केली पाहिजे .आणि हे सार करताना तुम्ही अस करा कि कुणाच मन दुखवल जानार नाही न याची काळजी घ्या समजवा मित्र परिवारास
कोण्या ही जिवाचा न घडो मत्सर ।
वर्म सर्वेश्वरपूजनाचे ॥
आणि अस वागण हे हि एक प्रकारे देवाची पूजा केल्याप्रमाणे आहे .
जीवनात चढ उतार तर असतातच कि , आयुष्य संघर्ष करायला शिका जिथे अत्याचार चुकीच्या गोष्टी दिसतात लागलीच आवाज उठवा आपण सारे एक होऊ या आणि जस महाराजांनी म्हटल कि आपला धर्म विष्णुमय अर्थात आनंदच स्वरूप अस आनंदाने बहरून टाकूया .
आणि हा सर्व आनंद कुठे तर केवळ आपल्या वारकरी संप्रदायातच ..
तर नक्की तुम्हाला याकॅह अनुभव घ्याचाय ना तर अवश्य वारीस या पहा ना   “ तो सुख सोहळा स्वर्गी नाही ” अस उगाच का म्हटल्य जन्मासी येउनी पहा रे पंढरी !
आजच्या तरुणाईला माझ्या बंधू भगिनींना हाच संदेश आहे कि शिक्षण घ्या यात वादच नाही मात्र त्याला अध्यात्माची जोड द्या अगदी दुधात जशी साखर आगदी तस होऊन जाईल .
शोकांतिका हीच वाटते कि आज परदेशातील युवा इथे येऊन आपल्या संत साहित्य वर अभ्यास करून पदव्या घेऊ लागले एका दृष्टीने चांगल हि आहे कि आपल संत साहित्य जगभरात जातय मात्र आपल्या मुलांनी भारतीय संस्कृती सोडून पाश्चिमात्य संस्कृतीच अवलोकन करण्यास सुरवात केली . उठा जागे व्हा अजून हि वेळ गेलेली नाही .
असो तूर्त आपली रजा घेतो लवकरच भेटू नवीन विषया सोबत .
यात जे काही चुकल असेल ते माझ आणि बरोबर ते गुरुवर्य प्रमोद महाराजांचं आमच्या पूजनीय . देगलूरकर  परंपरेच .
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

आई तल ना ग वालीला .... - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पहा कस हे बाळ आपल्या आईला विनवतय जायचं मला विठुरायाच्या भेटीला तल ना ग वालीला   ...


लेकुराचे हित | वाहे माउलीचे चित्त ||
ऐसी कळवळयाची जाती | करी लाभाविण प्रीति ||
पोटी भार वाहे | त्याचें सर्वस्वही पाहे ||
तुका म्हणे माझें | तुम्हा संतांवरी ओझें ||
तुमचा ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

माझ्या जीवीची आवढी पंढरपुरा नेईन गुढी ! - अक्षय भोसले

माझ्या जीवीची आवढी पंढरपुरा नेईन गुढी !

माऊली माऊली माऊली ..

Friday 30 May 2014

संत ज्ञानेश्वर महाराजांचा जन सामान्य वर्गास उपदेश - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
माऊली हो जस कि आपण पाहिलं मागील “ मेळविले मांदी वैष्णवांची “ मध्ये माउलींनी कसा प्रकारे सायास करून दिंडी सोहळा पंढरीची वारी सुरु केली .
पंढरीकडे मार्गक्रमण करताना लोकांना पंढरीस चलण्याविषयी उपदेश  करू लागले तो असा कि ,
वाजतसे बोंब कोणी नायकती कानीं । हरि हरि न म्हणती तया थोर झाली हानी ॥१॥
उठा उठा जागा पाठीं भय आलें मोठें । पंढरीवांचुनि दुजा ठाव नाहीं कोठें ॥२॥
तापत्रय अग्नीचा लागला वोणवा । कवण रिघे आड कवण करी सावाधावा ॥३॥
देखोनि ऎकोनि एक अंध बहिर झाले । विषयाचे लंपट बांधोनि यमपुरीस नेले ॥४॥
आजा मेला पणजा मेला बाप मसणा नेला । देखत देखत नातु पणतु तोही तैसा झाला ॥५॥
व्याघ्र लासी भूतें हीं लागताती पाठीं । हरि भजन न करितां सकळें घालूं पाहे पोटीं ॥६॥
संतसंग धरा तुम्ही हरिभजन करा । पाठी लागलासे काळ दांत खातो करकरां ॥७॥
बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण । भावें न रिघतां न चुके जन्ममरण ॥८॥
असा उपदेश केल्यामुळे बऱ्याच लोकांना वैराग्य होऊन दिंडीत सामील होऊ लागले , त्यांना माझ्या माऊली म्हणत असत नुसते मार्गक्रमण नाही करायचं  तर मुखाने भजन करायचं  ते मग कस ..
गात जा गा गात जा गा | प्रेम मागा विठ्ठला ||
अशी सावळ्या पांडुरंगाची प्रेमाने आळवणी करीत लाखो वारक-यांची मांदियाळी पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे. बोलावा विठ्ठल। पाहावा विठ्ठल। करावा विठ्ठल। जीवेभावे॥ अशी त्यांची अवस्था झालेली आहे. सर्व लौकिक आणि भौतिक सुविधांचा-सुखाचा त्याग करून हे वारकरी मोठय़ा भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने निघालेले आहेत. जात, धर्म, श्रेष्ठ, कनिष्ठ हे सर्व भेद गळून पडले आहेत. समाजातील सर्व घटक या ठिकाणी एकरूप झाल्यासारखे दिसु लागले . ज्याप्रमाणे अनेक नद्या अखेर सागराला येऊन मिळतात तेव्हा आपले स्वत्व टाकून सागराशी एकरूप होऊ लागले  . त्याचप्रमाणे समाजाच्या सर्व स्तरात वावरणारे लोक या ‘वारी’शी एकरूप झाल्याचे दिसु लागले जस कि पुंडलिक राय यांना
अवघी सुखाची राशी | पुंडलिकासी ओळळी ||
असे भजन करत चालण्यामुळे शेकडो भाविक मोहित होऊन दिंडीत येऊन अधिकच भर पडत चालली . ज्याप्रमाणे गंगेच पान जात असता मार्गाने लोकांचे पाप ताप घालवत व किनाऱ्याची झाडे पोषित जाऊन  समुद्राला मिळत .
कां फेडित पाप ताप| पोखीत तीरींचे पादप |
समुद्रा जाये आप। गंगेचें जैसें ||
तैसे बांधली सोडीत | बुडाली काढीत |
साकडी द्व्डीत | आर्तांचिया || -  || संत ज्ञानेश्वर महाराज  ||
असे गावो गाव मुक्काम  करत पंढरीच्या दिशेने भजन करत मार्गक्रमण करू लागल्या माझ्या माऊली व वारीत भजन करण्याची प्रथा पद्धती निर्माण झाली . .
आवडल्यास नक्कीच इतरांपर्यंत हि पोहचवा व अध्यात्मिक कार्यास सर्वांपर्यंत पोहचवण्यास सहयोग करा
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

चला येतंय न मग वारीला तुम्ही हि ? - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
चला येतंय न मग वारीला तुम्ही हि ? 
  

वारकरी मांदियाळी आपल्या प्रतीक्षेत ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

Thursday 29 May 2014

“मेळविली मांदी वैष्णवांची ”- अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पहा ना जस कि आपण म्हणतो कि वारी जवळ आली आता तयारीला लागल पाहिजे अगदी असच जेव्हा माउलींनी वारी सुरु केली तेव्हाचा प्रसंग आपणापुढे मांडण्याचा आमचा हा प्रयत्न !
संताचिये पायी हा माझा विश्वास | सर्व भावे दास झालो त्यांचा || गुरुवर्यांना दंडवत 

माझ्या माऊलीने अर्थात ज्ञानेश्वरांनी वयाच्या १६ व्या वर्षाच्या आत रेडा बोलवणे , मेलेले पितर जेवण्यास बोलवणे , मशीद बोलविणे , सच्चिदानंदयांस जिवंत करणे , ज्ञानेश्वरी अमृतानुभव व इतर ग्रंथ लिहिणे , भिंत चालवणे , पाठीवर मांडे भाजून दाखवणे वैगरे सर्व कृत्य केली म्हणजे ये मराठीचिये नगरी | ब्रह्मविद्येचा सुकाळ करी | घेणे देणे सुखचि वरी || व मिरविला बडिवार सिद्धाईचा || हि सर्व कामे पूर्ण झाली . आता उरलेल्या आयुष्यात भक्ती व वारकरी पंथाचा प्रचार करणे हे काम राहिले होते . त्याकरिता काय काय केले पाहिजे , याची आखणी करून , दिंडीची रचना केली , त्याकरिता टाळ , घोळ , चिपळ्या , विना , मृदुंग , भेरी , तुतारी , कुंचा म्हणजे चवरी , गरुड , ध्वज , पताका ,दंड , देवाचा छडीदार चोपदार , एवढी सामुग्री तयार करून दिंडीची रचना केली व त्याकरिता “मेळविली मांदी वैष्णवांची ”
भक्त समुदाय मिळवला व शके १२१३ ला आषाढी वारीस पहिली दिंडी काढली .कारण १२१२ मध्ये नेवाश्यला होते त्याच्या अगोदर पैठणात होते . म्हणून पहिली वारी शके १२१३ च मानली पाहिजे असो याप्रमाणे दिंडीची रचना करून पंढरीस निघाले त्याचे वर्णन एका अभंगात ज्ञानोबा माऊली करतात ते अस कि ,
उंच पताका झळकती | टाळ मृदुंग वाजती |
आनंदे प्रेमे गर्जती | भद्रजाती विठ्ठलांचे ||१||
आले हरीचे विनट | वीर विठ्ठलाचे सुभट |
भेणे दिप्पट | पळती थाट दोषांचे ||२||
तुलसीमाळा कंठी | गोपीचंदनाच्या उटी |
सहस्त्र विघ्ने लक्ष कोटी | बारा वाटा पळताती ||3||
सतत कृष्णमुर्ती सावळी | खेळे हृद्यकमळी |
शांती क्षमा तयाजवळी | जीवेभावे अनुसरल्या ||४||
सशत्र नामचे हातीयेर | शंख चक्राचे शृंगार |
अति बळ वैराग्याचे थोर | केला मार षडवर्गा ||५||
ऐसे एकांग वीर | विठठल रायाचे डिंगर |
बापरखुमा देवीवर | तीही निर्धार जोडीला ||६||
श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा २२६
निवृत्ती संत हा सोपान | महावैष्णव कठीण |
मुक्ताबाई तेथे आपण | नारायण जपतसे ||५||
ज्ञानदेव वैष्णव मोठा | विठ्ठ्ल नामे मुक्तपेठा |
स्नान दान घडे श्रेष्ठा | वैकुंठा वाटा संत गेले ||६||
श्री संत ज्ञानेश्वर महाराज गाथा २२७
आषाढी पर्वणी आला यात्रा काल | निघाले सकळ वारकरी ||
या प्रमाणे श्री संत ज्ञानेश्वर महाराज दिंडी सोहळा काढून वाटेने भजन करीत पंढरीस निघाले .
जस माउलींनी तेव्हा तयारी केली तसीच अगदी आता सर्व संस्थान महाराज मंडळी सर्व भक्त जन तयारी करू लागले वैष्णवंची मांदी मिळवू लागलेत . पहा जरा आठवून तो प्रसंग डोळ्यापुढे केवळ आनंद आणि आनंदच
जास्तीत जास्त युवा वर्गापर्यंत देशा विदेशात वारकरी संप्रदाय अग्रगण्य असावा जसा कायमच राहत आला आहे या करीतच हा छोटा प्रयत्न .युवकानो जास्तीत जास्त संत साहित्य वाचा . विज्ञान युगातील शिक्षणाला अध्यात्माची जोड द्या आणि पहा आनंद काही निराळाच
आपण वेळ काढून इतक सर्व वाचल आपणास द्यावे तितके धन्यवाद कमीच .
इतरांपर्यंत हि माहिती पोहचवता आली तर नक्कीच प्रयत्नशील रहा हि विनंती !
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

पाऊले चालती पंढरीची वाट .... अक्षय भोसले

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पाउले चालती पंढरीची वाट ..यंदा आपणहि चला , पहा काय आनंद असतो वारीचा तो !
असो

आपण जर पूर्व इतिहास पाहिला तर आपणास अस पाहिला मिळेल कि माउलींच्या आधी दोन थोर तथा महान व्यक्तींनी प्रतिज्ञा केली होती त्यात प्रथम नाव येत ते महान शिवभक्त रावणजी याचं व तद्नंतर पितामहा भीष्मजी रावणाची अशी प्रतिज्ञा होती कि संपूर्ण लंका सोन्याची करीन मात्र केवळ सात कोटी घरच सोन्याची झाली इतर नाही दुसरी प्रतिज्ञा अशी होती कि सोन्याला सुगंध आणीन मात्र आज तागायत सोन्याला सुंगंध नाही आपणच अस म्हणतो एखादा चांगल काम झाल तर सोने पे सुहागा ..मात्र मुळात सोन्याला आजतगायत सुगंध नाही . तसरी प्रतिज्ञा अशी कि लंके भोवतालचा समुद्र सागर गोड करीन मात्र आज पर्यंत तो खारटच आहे आणि चौथी प्रतिज्ञा  अशी कि स्वर्गात जाण्याकरिता शिडी बनविण पण ते हि नाही होऊ शकल  मात्र रावण महाशयांच्या चारीहि प्रतिज्ञा विफल ठरल्या . आणि आणि पितामहां भीष्म यांनी संपूर्ण पृथ्वी निश्पांडवी करीन अशी प्रतिज्ञा केली मात्र  हि प्रतिज्ञा  चुतरा तो शिरोमणी यांनी होऊ नाही दिल . मात्र माझ्या माऊलीयांनी अशी प्रतिज्ञा केली होती कि
अवघाची संसार सुखाचा करीन | आनंदे भरीन तिन्ही लोक ||१||
जाईन  गे माये तया  पंढरपुरा | भेटेन माहेरा आपुलिया ||२||
आणि ती  सार्थ हि केली
 अशी ज्ञानेश्वरांना पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा झाली . पांडुरंगाची भेट होईल कि नाही , असे वाटयचे . पंढरीराव पाहुणे आमच्या घरी येतील काय ? किंवा आम्हाला तरी त्यांच्याकडे जावयास मिळेल काय ? कोण्या का रितेने होईना , देवाची भेट झाली पाहिजे , हाच ध्यास घेतला . ज्याला त्याला विचारायचे , आम्हास पांडुरंगाचे दर्शन घडेल काय ? एक वेळ तर एक कावला कांव कांव करत असता , तय्लाच विचारू लागले . बहुतेक असा कावला ओरडू लागला तर स्त्रिया म्हणतात , आज कुठला तरी पाहुणा येणार व ज्याचे नाव घेतले असता कावळा उडून जातो , तेव्हा समजावे कि तो पाह्गुना आज येणार आहे , त्याप्रमाणे ज्ञानोबा स्त्रीची भूमिका घेऊन एका मैत्रिणीला म्हणतात .सखे ! तो कावळा काही उडला नाही . तेव्हा माऊली नवस करू लागली . उड उड रे काऊ |  तुझे सोनेने मढिवन पाऊ || दहीभाताची उंडी | लावीन तुझे तोंडी || दुधे भरुनी वाटी | लावीन तुझे ओठी || असे चार पाच नवस केल्यावर कावळा उडाल्याबरोबर ज्ञानोबा म्हणतात , ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे | भेटती पंढरीराणे शकून सांगे || या प्रमाणे ज्ञानेश्वारांशी पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास लागला व मी पंढरपूरला कधी जैन कधी जैन असे झाले व शेवटी पताका घेऊन पंढरीशी जायचेच असा त्यांनी निश्चय केला .
 माझ्या मनाची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी ||
पांडुरंगी मन रंगले | गोविंदाचे गुणी वेधले ||
जस कि आपण आज हि पाहतो माउलींचा अश्व ....
माय माऊली माझी माऊली ....माऊली ...माऊली ...
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

Wednesday 28 May 2014

भक्तराज पुंडलिक अल्प चरित्र - पंढरीची वारी विशेष

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
आज आपण पाहणार आहोत ते पंदृंग परमात्मा पंढरीला कशा प्रकारे आला व कोणाकरिता आला संपूर्ण इतिहास

पंढरीची वारी विशेष –

भक्तराज पुंडलिक अल्पचरित्र

तंव हरी अंकीं राधा बैसली | रुक्मिणीने ते पहिली ||
मनी विषमता उदेली | मर्यादा न धरी माझी हे ||
आणि पुढील भविष्य जाणोनी | रुक्मिणी निघाली रुसोनी |
दक्षिणे मानदेंशी दिंडरी वन | त्ये स्थळी पातळी ||
मग बाळ वेश घेऊन | गोकुळी आला श्रीकृष्ण |
गाईगोपाळ संवे घेऊन | दक्षिण दिंशी पातला ||३७ ||
गाई गोप ठेवोन वेणू नांदी | आपण निघाला रुक्मिणी शुद्धी |
तों दिंडर वनामधी | तप आचरत बैसली ||३८||
ऐकोन रुक्मिणीचे वचन | हास्य करी जगजीवन |.
गळया मंधी हात घालोन | आलिंगन दिले प्रीतीने ||४१ ||
दिंडरवन पाहत पाहत | तों पुढे दिखेले लोह दंडतीर्थ |
तेथे मायबापाची सेवा करीत | बैंसला विप्र पुंडलिक ||४३ ||
सूर्यवंशी राजा दशरथ | तयासी घडला श्रावण घात |
तोची हा पुंडलिक यथार्थ | चरित्र त्यांचे परियेसा ||४४ ||
मानदेशी ग्रामस्थ जाण | तेथे भिक्षुक वृत्ती पद्मनाभ ब्राह्मण |
कांता गोदावरी सुलक्षण | अपार गुणवान सर्वज्ञ ||४५ ||
बहु प्रयत्न करता जाण | उदरी एकाची झाले संतान |
त्यांचे नाम पुंडलिक पूर्ण | आवडी जाण ठेविले ||४६||
 असा पुंडलिकाचा इतिहास विस्तारपूर्वक संत एकनाथ महराजांनी लिहला आहे . पुंडलिकाचे लग्न होऊन तो स्त्रीलंपट झाला . पूर्व जन्मात अपूर्ण राहिलेली कशी यात्रा पूर्ण करावी , असे आई वडिलास वाटले व टी आपली इच्छा त्यांनी पुंडलिकास सांगितली , पण पुंडलिकाची बायको म्हणाली , या म्हातारा म्हातारीला नेण्यात आपणास त्रास होईल , म्हणून यांचं बरोबर आपण येत नाही . शेवटी यात्रेकरूसोबत आई वडील निघाले व नंत्य्र पुंडलिकाने जाण्याची तयारी केलि . पुंडलिकाची पत्नी सासू- सासऱ्यास म्हणाली कि , तुम्हाला यायचे असेल , तर खुशाल या , पण आम्ही तुमचे काहीच करणार नाही , असे म्हणून सर्वच यात्रेला निघाले .
पुढे कुक्कुट ऋषींच्या आश्रमावर तीन स्त्रिया मलीन रूपाने येऊन दास्र्ह्न घेऊन परत जाऊ लागल्या असता पुंडलीकाने त्यांना विचारले , हा काय प्रकार आहे ? त्यावर त्यांनी उत्तर दिले कि , आम्ही गंगा यमुना सरस्वती असून तुझ्यासारख्या आई वडिलांची सेवा न करणारे पातकी आमच्यात स्नान करून पाप विसर्जन करतात व ते पाप आम्ही ऋषींच्या दर्शनाने घालवतो . हे ऐकून पुंडलिकास पश्चाताप होऊन त्याने आई वडिलांची सेवा करण्यास सुरवात केली व त्याच्या भावाने देव पंढरपूरला आले .
“ पुंडलिकाच्या भावार्था | झाला गोकुलीहुनी येता |”
मतांतर
अन्य मते पुंडलिकास काशीला जाताना रोहिदास महाराजांनी उपदेश केला कि काशीला जाऊन काय करतोस . आई वडिलांची सेवा करत नाहीस .
“ माय बाप केवळ काशी | तेणे न जावे आणिक तीर्थाशी || ”  किंवा “अरे मन चंगा , तो काठोक मी गंगा ”
असे म्हटल्यावर पुंडलिक म्हणाले , महाराज ! तुमच्या या कातड्याच्या काठोक मध्ये पैसा टाकला , तर गंगेत जाईल काय ? असे म्हटल्याबरोबर काठोक मधून गंगेचा हात वर येऊन रोहीदासांचा पैसा घेतला , हे पाहून पुंडलिकास पश्चाताप होऊन घरी जुं तो आई वडिलांची सेवा करू लागला व तेही प्रमाण आहे , असे एकनाथ महाराज म्हणतात
अन्य मत कवी म्हणती | तोही आधार ग्रंथी ||
रोहिदास उपदेश स्थिती | पुंडलिकास मानली ||७७||
बहु ग्रंथ बहु कथा | श्रोती दोष ण ठेवावा सर्वथा ||
ज्या ज्या वाणी स्तविता | प्रिय सर्वथा हरीशी ||७८||
आता यावरून पुंडलिक व रोहिदास एकाच काळातले होते , असे वाटते व रोहीदासांचे वर्णन नामदेवांनी केले आहे , यावरून ते ज्ञानदेव महाराज व नामदेवांचे समकालीन होऊन गेले असेहि होते व त्यांनी पुंडलिकास उपदेश केला .
पण हे जमत नाही , म्हणून कुक्कुट आश्रमातच उपदेश मानणे योग्य आहे . अस्तु , अशा त्या पुंडलिकास देवाने दर्शन दिले . पुंडलीकाने देवास आसन म्हणून एक दगडाची वीट उजव्या हाताने दिली , त्यावर देव उभे राहिले , गौतमच्या शापाने इंद्र टी वीट झाला होता . देव म्हणाले , ‘ पुंडलिका मी तुझ्यावर प्रसन्न झालो , वर माग .’ पुंडलिक म्हणाले कि , मूढ पापी जैसे तैसे | उतरी कसे लावूनी || देवानी वर दिला कि , मी पंढरपूरला येनारांच्या पाप-पुण्याचा विचार करणार नाही . मूढ पापी जसे अस्टेल तसे असोत . तयंचा उद्धार करीन .
“ पंढरीचे वारकरी | ते अधिकारी मोक्षाचे ||
पुंडलिका दिला वर | करुणाकरे विठ्ठले ||’’
याप्रमाणे देव पतीतांच्या उद्धराकरिता पंढरपूरला विटेवर उभे राहिले . पण शेकडो वर्षे देवाकडे कोणीच आले नाही . म्हणून ज्ञानेश्वरांना वाटले , आपण सर्व लोकांना गोळा करून दिंडीच्या रूपाने पंढरपुरास नेऊन त्यांना वारीचे वळण लावून त्यांचा उद्धार करावा . तसेच माझ्या जीवनाचेही साफल्य पंढरपूरला जाऊनच होईल असे वाटू लागले .
आणि आज आपण जी वारी पाहतो पंढरीची ती  हीच वारी माझ्या माऊली ज्ञानेश्वर महराजांनी सुरु केली  .
माझ्या जीवीची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी ||
आवडल्यास नक्कीच इतरांपर्यंत पोहचवा व अध्यात्मिक कार्यास पुढे नेण्यास मदत करा
साभार :- संत साहित्य  व ह.भ.प. निवृत्ती महाराज वक्ते .
तुमचा ,
अक्षय भोसले -८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदु संस्कृती !
#facebookdindi #वारकरी  #वारी  #पंढरपूर #आळंदी  #देहू  #पुंडलिक  #संत  #महाराज  #पालखी  #hindu #sant eknath #paithn #nashik #facebook #mumbai #maharashtra #youth #आईवडील #संत #संत साहित्य #पालखी सोहळा

Tuesday 27 May 2014

लवकरच येत आहे ..पंढरीची वारी !

अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

आदरणीय वैद्यराज प्रशांतजी सुरु " आयुर्वेद भूषण '' पुरस्काराने सन्मानित !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आदरणीय वैद्यराज प्रशांतजी सुरु सर आपणास आयुर्वेद भूषण पुरस्कार प्राप्त झाल्याच वृत्त समझल फारच आनंद झाला .
आपण केलेल्या आयुर्वेद क्षेत्रातील कार्याची हि पोच पावती असावी अस आम्ही सर्व मानतो . आपल्या उज्ज्वल ज्ञानदान तथा आयुर्वेदातील लक्षणीय कार्यास आमचा सलाम !
आपणास अनेकानेक प्रणाम तथा लक्ष लक्ष शुभेच्छा !
समस्त वारकरी वर्ग तथा वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !

Saturday 3 May 2014

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०१४

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा २०१४ 

* वेळापत्रक * 
आळंदी ते पंढरपूर 

शुक्रवार २० जून २०१४ 
पालखीचे प्रस्थान दुपारी ४ 
 वाजता
गांधीवाडा - आळंदी ( पालखीचा मुक्काम )

.......................................................................................................

शनिवार २१ जून २०१४
१ ) थोरल्या पादुका ( आरती )
२ ) भोसरी फाटा ( सकाळचा विसावा )
फुलेनगर ( दुपारचा नैवेद्य )
वाकडेवाडी ( दुपारचा विसावा )
पालखी विठोबा मंदिर, भवानी पेठ ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

रविवार २२ जून २०१४
पालखी विठोबा मंदिर भवानी पेठ , पुणे ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

समोवार २३ जून
शिंदे छत्री ( आरती ) ( सकाळचा विसावा )
हडपसर ( दुपारचा नैवेद्य )
१ ) उरूळी देवाची , २ ) वडकी नाला ३ ) झेंडेवाडी ( दुपारचा विसावा )
सासवड ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

मंगळवार २४ जून
सासवड ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

बुधवार २५ जून २०१४
बोरवके मळा ( सकाळचा विसावा )
यमाई - शिवरी ( दुपारचा नैवेद्य )
साकुर्डे ( दुपारचा विसावा )
जेजुरी ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

गुरुवार २६ जून २०१४
१ ) दौंडज शिव २ ) दौंडज ( सकाळचा विसावा )
वाल्हे ( दुपारचा नैवेद्य )
वाल्हे ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

शुक्रवार २७ जून २०१४
पिंपरे खुर्द विहीर ( सकाळचा विसावा )
नीरा ( दुपारचा नैवेद्य )
श्रींचे नीरास्नान ( दुपारचा विसावा )
लोणंद ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

शनिवार २८ जून २०१४
लोणंद ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

रविवार २९ जून २०१४
लोणंद ( दुपारचा नैवेद्य )
चांदोबाचा लिंब - उभे रिंगण - १ ( दुपारचा विसावा )
तरडगाव ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

सोमवार ३० जून २०१४
१ ) दत्तमंदिर , काळज २ ) सुरवडी ( सकाळचा विसावा )
निंभोरे ओढा ( दुपारचा नैवेद्य )
वडजल ( दुपारचा विसावा )
फलटण विमानतळ ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

मंगळवार १ जुलै २०१४
फलटण विमानतळ ( रात्रीचा मुक्काम )
.......................................................................................................

बुधवार २ जुलै २०१४
विडणी ( सकाळचा विसावा )
पिंपरद ( दुपारचा नैवेद्य )
निंबळक फाटा ( दुपारचा विसावा )
बरड ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

गुरुवार ३ जुलै २०१४
साधुबुवाचा ओढा ( सकाळचा विसावा )
धर्मपूरी पाटबंधारे बंगला कॅनॉलजवळ ( दुपारचा नैवेद्य )
शिंगणापूर फाटा पानसकरवाडी ( दुपारचा विसावा )
नातेपुते ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

शुक्रवार ४ जुलै २०१४
मांढवी ओढा ( दुपारचा नैवेद्य )
१ ) सदाशिवनगर - गोलरिंगण - १ ,
२ ) पुरंदावडे ( दुपारचा विसावा )
माळशिरस ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

शनिवार ५ जुलै २०१४
खुडुस फाटा - गोल रिंगण - २ ( सकाळचा विसावा )
विंझोरी ज्ञानेश्वरनगर ( दुपारचा नैवेद्य )
धावा - बावी माऊंट ( दुपारचा विसावा )
वेळापूर ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

रविवार ६ जुलै २०१४
ठाकूरबुवाची समाधी - गोल रिंगण - ३ ( सकाळचा विसावा )
तोंडले - बोंडले ( दुपारचा नैवेद्य )
टप्पा ( दुपारचा विसावा )
भंडीशेगाव ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

सोमवार ७ जुलै २०१४
भंडी शेगाव ( दुपारचा नैवेद्य )
बाजीरावाची विहिर - उभे रिंगण - २ , गोल रिंगण - ४ ( दुपारचा विसावा )
वाखरी तळ ( रात्रीचा मुक्काम )

.......................................................................................................

मंगळवार ८ जुलै २०१४
वाखरी ( दुपारचा नैवेद्य )
पादुकेजवळ उभे रिंगण - ३ - आरती ( दुपारचा विसावा )
पंढरपूर ( रात्रीचा मुक्काम )
.......................................................................................................
भागवत एकादशी , आषाढी यात्रा पंढरपूर

अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .

Thursday 1 May 2014

अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच वस्त्रे यत्न करू ।
शब्दचि अमुच्या जीवाचे जीवन, शब्दे वाटू धन जनलोका ।। 
तुका म्हणे पहा शब्दचि हा देव, शब्देचि गौरव पूजा करू ।।
संत तुकाराम महराज 
आज आपण जे कार्य करतो ते कधी हि न संपणार अर्थात अक्षय असत अस म्हणतात . आपण सर्वाना विनंती आजपासून आपण संतांच्या कोणत्या हि एक साहित्याच वाचन कराव .
आपणा सर्वाना अक्षय तृतीयेच्या अक्षय शुभेच्छा !
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य .

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! - अक्षय भोसले

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा ! 
गरजा महाराष्ट्र माझा ..! 
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य