Monday 18 July 2016

तस्मै श्रीगुरवे नम: ।।

बॊलावा विठ्ठल पहावा विठ्ठल !

।। ज्ञानेशो भगवान विष्णु: ।।
आज सर्व संतक्षेत्रातून आलेल्या पालख्या श्रीक्षेत्र पंढरपुरामध्ये प्रविष्ट झाल्या आहेत.सर्वत्र प्रसन्नतेचे , आनंदाचे वातावरण आहे.वारकरी संत आणि देवाच्या भेटीने सद्गदित,तृप्त होत आहेत. 'एक एका लागतील पायी रे',हे चित्र सर्वत्र दिसते आहे; परंतु या सर्वांमध्ये सर्वांत आनंद जर कोणाला होत असेल तर तो भगवान श्री पंढरीनाथांस ! आज भगवंताचे सर्व लाडके भक्त त्याच्यासाठी एकत्र आले आहेत.यापेक्षा आनंद देवास तरी कोणता असावा ? म्हणूनच श्रीनामदेवरायांजवऴ भगवान विनंती करतात-
' आषाढी,कार्तिकी विसरू नका मज ।'
वारक-याच्या भेटीत देवासही आनंद वाटावा,अस वारक-यांत काय विशेष आहे ? ते म्हणजे वारक-याचे जीवन विठ्ठलमय असते म्हणून ! वारकरी श्रीपंढरीनाथाशिवाय अन्य काही मानत नाही.स्वत:चे सर्वस्व तो भगवंतास समर्पित करतो." मनेसहित वाचा काया । अवघे दिधले पंढरीराया ।।" हाच भाव त्याच्या अंत:करणामध्ये असतो.अर्थात,हे समर्पण एका क्षणांत होत नसते.परंपरेने चालत आलेल्या वारीचे सश्रद्ध आणि निष्ठावंत साधना,संतवाङ्मयाचे अंतर्मुख होऊन डोऴसपणे केलेले चिंतन आणि परमार्थाच्या वैचारिक अधिष्ठानावर कर्मयोगाशी न घेतलेली फारकत हे सर्व त्यांस कारण ठरते आणि हेच वारकरी जीवन होय.कर्म,ज्ञान आणि उपासनेची ही त्रिसुत्री वारक-यांच्या जीवनांत एकत्रित झालेली दिसते.
जीवनाची ही झालेली एकलंबनत्मकता हेच मानवी जीवनाच्या सुखाचे रहस्य आहे.दुर्दैवाने वा प्रपंचाची आवश्यकता म्हणून मनुष्य आपल्या जीवनामध्ये परिवर्तनीय,सुखाचा आभास निर्माण करणारी आणि प्रगल्भ विचारापुढे तुच्छ ठरणांरी ध्येय ठेवतो.त्याच्या प्राप्तीमध्ये अंतोगत्वा दु:ख भोगतो;पण खरा वारकरी मात्र आपल्या जीवनाचे ध्येय विठ्ठलभक्तीशिवाय अन्य काही ठेवत नाही,याचा अर्थ तो प्रपंच करीतच नाही, असे नाही.तर आपला प्रपंचच तो भावबऴाने विठ्ठलमय करतो.यासाठी त्याच्याकडे जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी सांगितलेला उपाय आहे-

बॊलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ।

करावा विठ्ठल जीवभाव ।।

येणे सॊसे मन झाले हावभरी ।

परत माघारी येत नाही ।।

© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.

वै.पूज्य श्रीगुरु मामासाहेब दांडेकर पुण्यस्मरण !

।। दर्शने प्रशस्तीसी ठावो ।।
पुण्यातील एस पी काॅलेजमध्ये मुलांना शिकवण्यासाठी वर्गात आलेले  शिक्षक धोतर. बंड़ी व ड़ोक्यावर टोपी परिधान केलेले बघुन वर्गातील मुलांनी उपहासाने आपल्या शिक्षकांना बघून
पुड़ंलिक वरदा हरि विठ्ठल
श्री ज्ञानदेव तुकाराम
पढंरीनाथ भगवान कि जय
माऊली ज्ञानेश्वर महाराज कि जय
जगदगुरू तुकाराम महाराज कि जय
असा जय घोष करावा

त्या शिक्षकांनेही आपल्या विद्यार्थ्यांना  पुन्हा आदराने सांगावे
बघा विद्यार्थ्यांनो
ह्या वारकरी वेशाची किती महानता आहे
मला या वारकरी वेशात बघुन जर तुम्हाला भगवान पढंरीश परमात्माच स्मरण होत असेल
तर हि या सप्रंदायाच्या वेशाची महती आहे
हे आपल्या शिक्षकाचे उत्तर ऐकुन सर्व वर्गच पुन्हा मौन झाला
ते फर्ग्युसन काॅलेजातील शिक्षक होते वै . शं वा . उर्फ सोनोपंत (मामासाहेब) दाड़ेकंर
शके१८१८
वैशाख शुद्ध ७ सोमवार २० -४ -१८९६ रोजी ठाणे जिल्ह्यातील माहिम येथील जन्म
घरातिल बालवयातच झालेले बालमनावर उत्तम संस्कार
अंगचीच श्रेष्ठ बुद्धीमत्ता

बालवयातच गुरूवर्य जोग महाराजांची झालेली कृपा
सदगुरू मुखातुन कोवळ्या वयातच ग्रंथराज ज्ञानेश्वरीच श्रवण
शिस्तीचे अतिशय भोक्ते . वक्तशीर स्वभाव असुनही स्वभावातील गोड़वा अवर्णनीयच
चारीत्र सपंन्न . कर्तव्यदक्ष व निष्णांत शिक्षक म्हणून ख्याती असलेले मामासाहेब नैष्टिक ब्रम्हंचारी होते
शिकवण्याच्या मानधनातुन मिळालेल स्वनिर्वाहा पुरतेच ठेवुन उर्वरीत गरजु विद्यार्थ्यांना मदतीसाठी वापरत
इतका मनमिळाऊ स्वभाव
समोरच्याला क्षणात आपलंस करणारा व्यक्तीमत्व
परंतू
कुर्वन्नपि न लिप्यते
या त्यांच्याच अति आवड़त्या वाक्याप्रमानेच ते कशाला चिकटलेच नाही
मामा खरे तर होते संसारात
पन ते तर साध्या वेशातील उत्तम संन्यासी जीवन जगत होते
अधिकार तैसा करू उपदेश
हि तर मामासाहेबांची ख्यातीच
जो कोणी प्रश्न विचारला येईल
त्याच्या योग्यतेनुसार उत्तर देऊन समाधान करत
वारकरी वेशाबद्धल मामासाहेब म्हणत
बाबांनो
हा पांढरा वेश परिधान करताय
हे खूप छान आहे
पण
या पांढर्या कपड़्यात वावरताना खुप जपाव लागत
या पांढर्या कपड़्याला छोटासा सुद्धा ड़ाग सहन होत नाही
तो दुसर्याला अगदी सहजच दिसुन येतो
कोणी प्रश्न विचारला
मामा
मि ब्रम्हंचारी राहू का ?
तर ते अगदी सहजच म्हणत
लग्न करणेच बरे !
कारण
जो ब्रम्हंचारी राहू ईच्छितो
तो दुसर्याला विचारत फिरत नाही
असे मितभाषी व्यक्तिमत्व
अमानीत्व . निरपेक्षीत्व व अनासक्ति हे गुण अंगी असल्याने
त्याच्यां केवळ दर्शनानेच पाहणार्यानां समाधान होत
व प्रसन्न वाटे
आज आषाढ शुद्ध चतुर्दशी
सोनोपंत उर्फ मामासाहेब दाड़ेकंर
या महात्माचा पुण्यस्मरण दिन
श्री संताचिये माथा चरणावरी ।
साष्टांग हे करी दंड़वत ।।