Sunday 24 August 2014

आदिनाथ गुरु सकळ सिध्‍दांचा - श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री निवृत्‍तीनाथ महाराज आपली नाथपरंपरा आदिनाथापासून म्‍हणजेच भगवान शंकरापासून असल्‍याचे सांगतात. "आदिनाथ उमा बीज प्रगटले । मच्छिंद्रा लाधले सहज स्थिती ॥ तेची प्रेममुद्रा गोरखा दिधली । पूर्ण कृपा केली गहिणीनाथ ॥" या अभंगातून तर श्री ज्ञानराज माऊली -"आदिनाथ गुरु सकळ सिध्‍दांचा ।" या अभंगातून सांगतात. त्याच शिवशंकरा चरणी नमन ! 
अक्षय भोसले - ०८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र !

गोसेवा हीच ईश्वरसेवा ! - संत तुकाराम महाराज


|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

गोसेवा हीच ईश्वरसेवा ! 
भूतदया गाई पशुंचे पालन | तान्हेल्या जीवन वनामाजी ||
स्वत : जगतगुरू तुकाराम महाराज आपणा सर्वाना उपदेश करतात कि आपण प्राणी मात्रांवर दया केली पाहिजे प्रेम केल पाहिजे आणि हेच सांगताना ते गाई अस नमूद करतात , ज्या गाईच्या दुधामुळे आपण सर्व आज सशक्त आहोत मात्र आज तीच आपली आई धोक्यात आहे ! निर्धार करा कि आपल्या विभागातील गाईंची स्वत : काळजी घ्याल . गो मातेचे संरक्षण झालेच पाहिजे . गेले काही दिवस पवई येथून दिवसेंदिवस गाईंच प्रमाण होत आहे काही अज्ञात इसम रात्री टोळी नि येऊन गायांची चोरी करतातपकडतात , भले मोठे असे इंजेक्शन दिले जाते काही क्षणात त्या बेशुद्ध पडतात , विभागातील काही युवा मुलांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व सशत्र तथा हत्यारबंद असतात आपला नाईलाज होत आणि प्रशासन हि याकडे अजिबात लक्ष देत नाही आता अआप्नच उपाय सुचवा ? नेमक गो भक्तांना गो रक्षकांनी काय करावे . वारंवार पोलीस यंत्रणा अदिना सांगून हि कोण काहीच करत नाही .अजून किती दिवस हे असच चालणार ? 
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 


|| श्री गणेश नमन || - श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| श्री गणेश नमन || 

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे शुभाशीर्वाद तथा शुभेच्छा वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र यांस !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


आदरणीय ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांच्याशी संवाद साधताना ह.भ.प.अक्षय महाराज भोसले ! 
विषय :- आजची युवा पिढी आणि आपल संत साहित्य 
अण्णा यांनी अस प्रतिपादन केल कि आजच्या सरकारने 'नगरेची रचावी जलाशये निर्मावी। महावने लावावी नानाविध॥'' ज्ञानेश्वरीचा अभ्यास केला पाहिजे तेव्हा पाणी टंचाई थांबेल मोठ्या प्रमानात युवा वर्गाने सक्रीय राहील पाहिजे तेव्हा आपला देश विकासाकडे जाईल , आण्णा यांनी आपले आशीर्वाद तथा शुभेच्छा वारकरी संप्रदाय युवा मंच च्या कार्यास दिल्या .