Tuesday 29 April 2014

अध्याय प्रथम ओवी क्रमांक ७५ ते ७७ निरुपण

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पहा न किती सुंदर ओवी आहे अगदी अगदी या ओवी माउलींच्या ओवी प्रमाणे माउलींनी माझ्यावर कृपा केली आहे . ज्ञानेश्वरी प्रथम अध्याय ओवी क्रमांक ७५ , ७६ आणि ७७ 

परी एथ असे एक आधारु । तेणेचि बोलें मी सधरु । जे सानुकूळ श्रीगुरु । ज्ञानदेवो म्हणे ॥ 
येर्‍हवीं तरी मी मुर्खू । जरी जाहला अविवेकु । तरी संतकृपादीपु । सोज्वळु असे ॥ 
लोहाचे कनक होये । हे सामर्थ्य परिसींच आहे । की मृतही जीवित लाहे ।
माऊली म्हणतात मला श्रीगुरू अनुकूल आहेत त्यांचाच मला आधार आहे आणि त्यांच्या मुलेच मला काव्य ज्ञानेश्वरी लिह्ण्याकरिता धीर आला अन्यथा अर्थात एरवी मी खरोखर मुर्क , अज्ञानी असून अविचारच करीत आहे तथापि तुम्हा संताचा कृपारूपी दीप मार्गदर्शक आहे , हे मी माझे भाग्य समझतो . जस कि परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोने होते किंवा मेलेल्या माणसाला अमृत पाजले कि तो जिवंत होतो अगदी तशीच कृपा माउलींची माझ्यावर आहे . आम्ही जे काही चांगल कार्य करतो यामागे गुरुवर्य महंत प्रमोद महाराज जगताप याचं मार्गदर्शन तथा आधार असतो . योगियांची माऊली ज्ञानियांचे राजे असे ज्ञानेश्वर महाराज मात्र पहा स्वत : मूर्ख अज्ञानी म्हणवून घेतात . किती मोठेपण आहे माउलींची हाच गुण सर्वांनी अंगिकारला तर समजतील प्रत्येक व्यक्ती उच्चस्थ पदावर विराजमान होईल " नम्र झाले भूत तेणे कोंडिले अनंता " किवा "तुका म्हणे भोळा जिंकू काळी काळा " संतांची कृपा गुरुकृपा हेच माझे दीप मार्गदर्शक आहे अस माऊली प्रतीपादित करतात व संत भेट हे माझ परमभाग्य असे समजतात . जस कि परिसाच्या सामर्थ्याने लोखंडाचे सोन होत किंवा मेलेल्या माणसाला अम्रूर पाजले कि तो जिवंत होतो तसच अगदी गुरु कृपेने संत भेटणे हेच सुख प्राप्त होते .
संतचरणदास अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 

आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘डॉक्टरेट ऑफ लिटरेचर’ अर्थात ‘डी .लिट’ या पदवीने सन्मानित

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
‘‘उत्तम समाज घडविण्यासाठी माणसाला ज्ञानाची गरज असते आणि शिक्षणातूनच मानवाला उदंड ज्ञान मिळते. विद्येने मनुष्य समृद्ध होतो. त्यासाठी शिक्षण घेतलेच पाहिजे,’’ असे मौलिक उद्गार थोर निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी तथा दत्तात्रेय नारायण धर्माधिकारी यांनी नवी मुंबई येथे व्यक्त केले.
 आप्पासाहेब धर्माधिकारी यांना डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठातर्फे ‘डॉक्टरेट ऑफ लिटरेचर’ अर्थात ‘डी .लिट’ या पदवीने सन्मानित करण्यात आले .आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी जे समाज प्रबोधनाचे कार्य केले, रंजल्या -गांजलेल्यांना त्यांनी जगायला शिकवले. जगातील करोडो कुटुंबाना त्यांनी सत्कार्याचा मार्ग दाखवला. तसेच ते हे कार्य विनामुल्य आणि कोणत्याही प्रसिद्धीसाठी करीत नाही. म्हणूनच त्यांच्या या महान कार्याची दाखल घेऊन डॉ. डी वाय पाटील विद्यापीठाकडून ‘डी लिट’ ही पदवी बहाल करण्यात आली . महाराष्ट्रातील संपूर्ण अध्यात्मिक क्षेत्राकरिता एक आनंदाची बाब आहे . अनेकानेक प्रणाम आदरणीय आप्पासाहेब धर्माधिकारीजी यांना दीर्घआरोग्य लाभो व पुढे हि समजाची अशीच सेवा घडत राहो हि माउलींचरणी प्रार्थना !
समस्त वारकरी संप्रदाय यांच्यावतीने खूप खूप शुभेच्छा !