Tuesday 24 January 2017

अनाथ कोण ? - श्रीगुरु श्रीचैतन्यमहाराज देगलूरकर

     सहसा एखाद्या व्यक्तीचे , बालकाचे माता-पीतांचे छत्र संपले कीं तो ' अनाथ ' झाला असे म्हणले जाते व ते योग्यच आहे .
  पण शास्त्रात या बद्यल अधीक विस्तृत तपशील दिलेला आहे ,
  १ ) कोणा एकाचे फक्त पीत्र छत्र हरवले व आई आहे तर त्यास शास्त्र अनाथ मानत नाही , तो सनाथच मानला जातो
  २ ) या उलट आई गेली व वडील आहेत तर मात्र तो अनाथ झाला अशी शास्त्र मान्यता आहे '
     याचे कारण आईचे स्थान सर्व श्रेष्ठ आहे व ती पीत्याची उणीव भरून काढू शकते पण तेच आईची उणीव पीता दुसरी आई आणुन भरून काढण्याने करू पाहतो !
    आपल्या मुलांच्या हिताचा कळवळा पराकोटीचा आईलाच तीच्या शेवटच्या श्वासा पर्यंत असतो !
याच साठी अनेक थोर संतांना , पूर्ण पूरूषांना देखील आई व्हावे वाटते ! माऊली, ज्ञानेश्वर माऊली , विठूमाउली असे अनेक दाखले देता येतील !
       काल शेळगांव , ता. चाकूर येथील किर्तनात श्रीगुरू मुखातून श्रवण केलेले अमृत कण !!

- श्री.सुरेशजी दिवाण सर
( सद्गुरू सेवा समिती , पंढरपूर )

अवश्य पहा - वारी निवृत्तीनाथांची साम टीव्ही वर ...!

जास्तीत जास्त शेयर करा व अवश्य पहा - वारी निवृत्तीनाथांची आपल्या साम टीव्ही मराठी वर ।।