Friday 18 July 2014

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील धातुशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील धातुशास्त्र विषयक संदर्भ ! 
चित्त शुद्ध करण्याकरिता सत्कर्म आवश्यक असतात हे सांगण्यासाठी उपमा देतात ,

भांगार आथी शोधावे | तरी आगी जेवी नुबगावे |
का आरिसयालागी साचावे | अधिक रज ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१४०

सोने ( धातु -Metal )शुद्ध करायचे असेल तर अग्नीचा कंटाळा करून चालणार नाही . अर्थात धातु हे अग्नीच्या सहाय्यानेच शुद्ध होतात .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील वनस्पतीशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||



     श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीत आलेले वनस्पतीशास्त्र विषयक संदर्भ ! 
परमेश्वरच्या संकल्परुपी बिजामधून हि सृष्टी निर्माण झाली आणि पुन्हा ती त्या संकल्पाताच सामावणार आहे . ( सृष्टी उत्पत्ती आणि लय ) हे सांगताना म्हटले आहे , 
बीज शाखाते प्रसवे | मग ते रुखपण बीजी सामावे |
तैसे संकल्पे होय आघवे | पाठी संकल्पी मिळे || 
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ९-२९२ 
ज्याप्रमाणे बी मधून खोड , मुळे , फांद्या इत्यादी सर्व झाड जन्माला येते आणि पुढे ते झाड लहानशा बी मधे सामावून जाते त्याप्रमाणे ...
( असाच विषय ' बीज मोडे झाड होये | झाड मोडे बीजी समाये | ' ..-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १७-५९ येथे हि आहे )
भाजलेले बी उगवत नाही ' बीजे सर्वथा आहाळली | .... तरी न विरुढती सिंचली |...
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी २-६६
पुढे पंधराव्या आध्यायात ' उर्ध्वमूलमध : शाखम ' यावर भाष्य करताना वनस्पतीशास्त्रातील बीजभाव , बीजांकुरभाव वृद्धी , फलभाव , पानझड इत्यादी अवस्थांचे सविस्तर वर्णन केले आहे .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

मुंबई अग्निशामक दलाचे " शहीद नितीन इवलेकर " यांना मानाचा सलाम - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

   मुंबई अग्निशामक दलाचे " शहीद नितीन इवलेकर " यांना मानाचा सलाम !                



                आज दुर्दैवी घटना घडली मुंबईत अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी इमारतीत गेलेला अग्निशामक दलाचा एक जवान नितीन इवलेकर शहीद झाला. या घटनेत २१ जवान जखमी आहेत , नितीन मित्रा तुझे हे धाडस आम्ही सदैव लक्षात ठेवू आमच्या साऱ्या मुंबईकरांच्या तू सदैव स्मरणात राहशील . शूरा मी वंदितो ! ;'( समस्त वारकरी संप्रदाय तथा मुंबईकर यांच्या वतीने तुला भावपूर्ण आदरांजली ! 
                         युवकांनो पहा आजचा या युवाने धाडस केल शेवटी जिंकला मात्र स्वत: ला मात्र हरवून बसला .गड आला पण सिह गेला अगदी असच काहीस घडल आमच्या नितीन इवलेकर यांच्या समवेत ! आपण हि हाच आदर्श घ्यावा कि आपल्या कार्याकरिता जीवाची बाजी लावायला पण आपण तत्पर असल पाहिजे हाती घेतलेले काम पूर्ण केलच पाहिजे .
तुझ्या या शुर बाळाला प्रणाम ! हे भारत माता तुझ्या खुशीत तुझ्या या मुलाला सामवून घे .

शूरा मी वंदितो ! नितीन इवलेकर अमर रहे ! शूरा मी वंदितो ! शूरा मी वंदितो !

शोकाकुल
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र परिवार

श्री ज्ञानेश्वरीतील आरोग्य / शरीरशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीत आलेल आरोग्य / शरीरशास्त्र विषयक संदर्भ आपल्यापुढे मांडण्याचा आमचा छोटा प्रयत्न ! 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आदर्श औषध कोणते याचा उल्लेख केलेला आहे .
जैसे रसौषध खरे | आपुले काज करूनि पुरे |
आपणही नुरे | तैसे होतसे ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१०७९
ज्या प्रमाणे खरे औषध आपले रोग्निवारणाचे अपेक्षित कार्य पूर्ण करून स्वत : ही संपून जाते , त्याचा कोणताही अन्य परिणाम ( side effect ) होत नाही . ( त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्तीनंतर साधनाची आवशक्यता संपते )
जीव भावासाठी पंचमहाभूतांचे केवळ पंचीकरण होऊन पुरत नाही तर पचीकरण होऊन पुरत नाही तर पंचीकरणा बरोबर ज्यावेळेस अहंकाराची उपलब्धी होते , त्यावेळेस पंचमहाभूते जीवभावास प्राप्त होतात . हे सांगताना म्हटले आहे ,
जैसा ज्वरु धातुगतु | अपथ्याचे मिष पहातु |
मग जालिया आतु | बाहेरी व्यापी ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १३-८०
जंतुसंसर्ग झाल्यावर लगेचच काही रोग होत नाही तर काही अपथ्य झाल्याच्या निमित्ताने शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यावर रोग होतो .
आपण स्वीकारलेल्या अन्नाप्रमाणे शरीर आणि मन- बुद्धी बनत जाते . यासाठी अन्नशुद्धीही महत्त्वाची असते .
तेवी जैसा घेप आहारु | धातु तैसाचि होय आकारू |
आणि धातु ऐसा अंतरु | भावो पोखे ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १७-११६
सेवन केलेल्या अन्नाच्या गुणांप्रमाणे शरीराला बल प्राप्त होते आणि अंत : करणही त्यानुसार बनत जाते ..
                 संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                  आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

ज्ञानेश्वरीतील भौगोलिक संदर्भ - शास्त्रज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||.

भौगोलिक संदर्भ 


अठराव्या आध्यायात , माणसाच्या शरीरात निरनिराळ्या प्रकारची कार्ये करणाऱ्या वायुत्त्वाच्या स्वरूपाविषयी म्हटले आहे , 

आणि पूर्वपश्चिमवाहणी | निघलिया वोघाचिया मिळणी |
होय नदी नद पाणी | एकचि जेवी ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१३१

ज्याप्रमाणे पूर्वेला वाहणारी नदी असो किंवा पश्चिमेला वाहणारी नदी असो , लहान नदी असो वा मोठा नद असो त्याचे पाणी एकाच समुद्राला जाऊन मिळते ,
(त्याप्रमाणे निरनिराळ्या इंद्रियांच्या द्वारे एकच प्राणशक्ती कार्यरत असते. )
आपल्या देशातल्या चार प्रमुख महानद्यांच विचार केला तर त्यापैकी गंगा , गोदावरी आणि कावेरी या पूर्व समुद्राला , गंगासागराला ज्याला बंगालचा उपसागर असे म्हटले जाते त्याला आणि नर्मदा हि पश्चिम समुद्राला सिंधू सागराला ज्याला अरबी समुद्र म्हटले जाते त्याला मिळतात .
भारता भोवती असलेले हे तीनही समुद्र वास्तविक एकच आहेत . पृथ्वीसाठी ' भूगोल ' हा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे .
उदा .
' .....भूगोलु हा || '
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १०-७०
किंवा

' तरि भूगोलुचि काखे सुवावा ..'
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १०-२६०

निगिजे पुर्विलिया मोहरा | की येईजे पश्चिमेचिया घरा |
निश्चळपणे धनुर्धरा | चालणे एथिंचे ||
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ६-१५९
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र