Wednesday 22 June 2016

कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत ज्ञानेश्वरमहाराज आषाढी वारी पालखी सोहळा २०१६

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

पायी वारीतील अंतरे :

आळंदी ते पुणे -२६.०४ कि.मी.
गांधीवाडा ते आळंदी :०० कि.मी. ते थोरल्या पादुका ०.०६ कि.मी. ते भोसरी फाटा ०५.०६ कि.मी. ते दिघी ०७.०७ कि.मी. ते म्हस्के वस्ती ११.०२ कि.मी. ते आर अँड डी फॅक्टरी ११.०८ कि.मी. ते साठे बिस्किट १२.०७ कि.मी. ते फुले नगर दत्त मंदिर १४.०२ कि.मी. ते हायवे बजाज गार्डन १७.०९ कि.मी. ते वाकडेवाडी १८.०९ कि.मी. इंजिनिअरिंग कॉलेज चौक १९.०६ कि.मी. ते म्हसोबा गेट २०.०९ कि.मी. ते ज्ञानेश्वर पादुका २१.०४ कि.मी. ते तुकाराम पादुका २१.०६ कि.मी. ते लकडी पूल २३.०६ कि.मी. ते भवानी पेठ २६.०४ कि.मी.

पुणे ते सासवड – २९.०९ कि.मी.
भवानी पेठ ते शिंदे छत्री ३.७ कि.मी. ते हडपसर ०८.२ कि.मी. ते ऊरुळी १३.०१ कि.मी. ते वडकी नाला १७.०५ कि.मी. ते झेंडेवाडी २१.०८ ते सासवड २९.०९ कि.मी.
सासवड ते जेजुरी -१८.०२ कि.मी.
सासवड ते जकात नाका ०१.०५ कि.मी. ते बोरके मळा ०४.०० कि.मी. ते यमाई शिवरी ०९.०३ कि.मी. ते साकुर्डी १३.०७ कि.मी. ते जेजुरी १८.०२ कि.मी.

जेजुरी ते वाल्हे – १३.०६ कि.मी.
जेजुरी ते दौंडज शीव ०५.०१ कि.मी. ते दौंडज ८.०९ ते वाल्हे शाळा १२.०८ कि.मी. ते गावानंतर मुख्य रस्ता १३.०० कि.मी. ते वाल्हे १३.०६ कि.मी.

वाल्हे ते लोणंद – १८.०६ कि.मी.
वाल्हे ते पिंपरी खुर्द ५.०१ कि.मी. ते नीरा १०.०८ कि.मी. ते रेल्वे फाटा १५.०८ कि.मी. ते लोणंद पूल १७.०२ कि.मी. ते लोणंद १८.०६ कि.मी.

लोणंद ते तरडगाव तळ - ०९.८० कि.मी.
लोणंद ते चांदोबाचा लिंब ते एस टी स्टँड ०८.०० कि.मी. ते तरडगाव तळ ०९.८० कि.मी.

तरडगाव तळ ते फलटण- २१.०६ कि.मी.
तरडगाव ते काळज ०४.०२ कि.मी. ते सुरवडी ०९.०३ कि.मी. ते निंभोरे ओढा ११.०७ कि.मी. ते वडज १४.०० कि.मी. ते फलटण २१.०६ कि.मी.

फलटण ते बरड- १८.०६ कि.मी.
फलटण ते विडणी ०६.०८ कि.मी. ते पिंपरद ११.०९ कि.मी. ते निंबळक फाटा १४.०८ कि.मी. ते बरड १८.०६ कि.मी.

बरड ते नातेपुते – २०.०३ कि.मी.
बरड ते साधुबोवाचा ओढा ०५.०४ कि.मी. ते सोलापूर हद्द ०७.०८ कि.मी. ते धर्मपुरी कॅनॉल ११.०० कि.मी. ते शिंगणापूर फाटा १५.०९ कि.मी. ते नातेपुते २०.०३ कि.मी.

नातेपुते ते वेळापूर – १६.०६
नातेपुते ते खुडूस फाटा ०४.०६ कि.मी. ते विंझरी ०९.०३ कि.मी.ते धावा १५.०७ कि.मी. ते वेळापूर १६.०६ कि.मी.

वेळापूर ते भंडीशेगाव- १६.०३ कि.मी.
वेळापूर ते ठाकूरबुवा समाधी ०४.०८ कि.मी. ते तोंडले ०८.०३ कि.मी. ते धावा ११.०३ कि.मी. ते भंडीशेगाव १६.०३ कि.मी.

भंडीशेगाव ते वाखरी-०८.०० कि.मी.
भंडीशेगाव ते रिंगण ०४.०४ ते वाखरी ०८.०० कि.मी.

वाखरी ते पंढरपूर- ०६.०७ कि.मी.
वाखरी ते पादुका ०३.०५ कि.मी. ते पंढरपूर ०६.०७ कि.मी.

- Varkariyuva.blogspot.in

हेतू शुद्ध ठेवावा - श्री महाराज

।। ज्ञानेशो भगवान विष्णु : ।।

मनुष्याने शुद्ध हेतू ठेवण्याचा प्रयत्‍न करावा. हेतू शुद्ध असला की स्वाभाविकच कृती त्याला अनुरुप होऊ लागते आणि प्रगतीला मदत होते. हेतू हा विहिरीत असणार्‍या झर्‍याप्रमाणे आहे. झरा गोड पाण्याचा असला म्हणजे विहिरीचे पाणी स्वाभाविकच गोड असते. म्हणुन हेतू शुद्ध ठेवण्याची दक्षता घ्यावी, आणि त्याकरिता रामाची प्रार्थना करावी. माणसाला देहरक्षणापुरते अन्न, वस्त्र आणि नाम घेण्याची बुद्धी असली की असमाधानाला जागा नाही. 'नको दैन्यवाणे जिणे भक्ति उणे' हेच रामराया जवळ मागावे. पर्वकाळात भगवंत कामधेनूचा अवतार घेतो; जे ज्याला पाहिजे ते त्याला देतो. पर्वकाळात सज्जन तसेच दुर्जनही आपली कामे करून घेतात. जारण-मारण ही देखील पर्वकाळांतच शीघ्र साध्य होतात. आपण मात्र भगवंताचे कसे व्हावे हे पहावे. शुभेच्छा धरावी, भावना जागृत करावी. 'काहीही कर, पण भगवंता तुझा विसर पडू देऊ नकोस.' असे भगवंताजवळ मागावे. 'आजवर कळत नकळत जे पाप झाले असेल ते नाहीसे कर. पुढे पुनः नाही करणार,' असे म्हणावे, म्हणजे मागली पापे नष्ट होतात. ज्याला विषयाची गोडी असते त्याला नाही परमार्थाची गोडी लागत. त्यांना 'मीच काय तो शहाणा, मोठा' असा अभिमान असतो. पण त्यांच्यापेक्षा लक्षावधी शहाणे आणि श्रीमंत जगात आहेत हे ते जाणत नाहीत. ते खालच्या लोकांकडे पाहतात आणि त्यांच्याहून मी श्रेष्ठ आहे असे म्हणतात. माझे चुकते आहे एवढे कळले तरी चालेल. विषयी लोकांना 'मला कुठे दुःख आहे' असे वाटते. पण दारूप्रमाणे विषयाची धुंदी उतरली म्हणजे पश्चात्ताप होतो.

'देव आहे' असे खर्‍या अर्थाने वाटणारे जगामध्ये थोडेच असतात. सद्‌विचार, सच्छास्त्र आणि सद्‍बुद्धि हे प्रत्येक माणसाला याच जन्मात भगवंताकडे नेण्यासाठी आहेत. प्रपंचाचा अनुभव कष्टमय आहे, पण भगवंताचा अनुभव आनंदमय आहे. तापाने आजारी असलेल्या माणसाला आपल्याला घाम यावा असे वाटत असते. पण नुसत्या वाटण्याने काही तो येत नाही, त्यासाठी डॉक्टरचे औषध घ्यावे लागते. तसे, ज्याला भगवंताचे प्रेम यावे असे वाटते, त्याने नाम घेणे हेच एक औषध घ्यावे. भगवंताचे प्रेम एकदा चिकटले की त्याच्या आड दुसरे काही येत नाही.

खाणीतल्या दगडामध्ये जसे सोने असते, तसा आपल्यामध्ये परमात्मा आहे. दगडातली माती अनेक चाळण्यांनी आणि यंत्रांनी काढून टाकतात आणि नंतर सोने हाती लागते, त्याचप्रमाणे अनेक वासना नष्ट झाल्यानंतर परमात्मा आपल्या हाती लागतो. आपण 'मी' पणाने मेल्यानंतर शेवटी परमात्मा प्रकट होतो.
शुद्ध असावे आचरण । तसेच असावे अंतःकरण । 
त्यात भगवंताचे स्मरण । हेच प्रपंच सुखी करण्याचे साधन ॥ 

-Varkariyuva.blogspot.in

पालखी सोहळ्यातील सर्व दिंड्याना विविध वृक्षांचे बीज वाटप !