Friday 17 January 2014

फलटण येथे कत्तलखाना होऊ देणार नाही - वारकरी संप्रदाय युवा मंच


|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

उठा  वैष्णवांनो  हिंदुनो वारकरी बंधू भगिनीनो  राष्ट्रभक्तानो समाजसेवकानो शेतकऱ्यानो ...
छत्रपती  शिवाजी महाराजांच्या सौभाग्यवती महाराणी राजमाता सईबाई साहेब यांची जन्मभूमीला रक्त रंजित करण्याच्या उद्देशाने फलटण नगर पालिका , धर्मद्रोही - राष्ट्र द्रोही असे आपले राज्यकर्ते आणि प्रशासणातील धर्मद्रोही अधिकारी यांनी फलटण शहरामध्ये अत्याधुनिक कत्तलखाना निर्माण करण्याचे कटकारस्थान रचले आहे .
                                           ज्या भूमी मध्ये हिंदूंचा छत्रपती  राजश्री शिवराय यांच्या सौभाग्यवती महाराणी राजमाता सईबाई साहेब यांचा जन्म झाला . ज्या भूमीमध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि लाखो संत वारकरी दरवर्षी मुक्कामी असतात टी भूमी गोवंशाच्या रक्त व मांसाने अपवित्र करण्याचे सुनियोजित कारस्थान रचले आहे .आम्ही हजारो राष्ट्र व गो भक्तांना बरोबर घेऊन " परमपूज्य श्री श्रद्धेय उदयनाथजी महाराज यांच्या नेतृत्वा खाली दिनांक २० जानेवारी २०१४ रोजी दुपारी १२.०० वाजता फलटण नगरपालिकेवर धडक मोर्चा निघालो आहोत . आता फक्त अपेक्षा आहे गो मातेच्या रक्षणासाठी आपल्या सहभागाची ....जास्तीत जास्त लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा हि नम्र विनंती ...!
संपर्क :- श्री .गोरक्षनाथजी घाडगे -९९८७७८१०४३
 श्री .अक्षय भोसले :- ८४५१८२२७७२
बंधुनो मोठ्या प्रमाणात शेअर करा . जोक आणि इतर गोष्टी आपण लगेच इतरांना फोरवर्ड करतो किमान तुमचे काही मिनिट्स लागतील पोस्त इतरांपर्यंत पोहचवायला .आपण आपल्या राष्ट्राकरिता किमान इतक तरी सहकार्य तरी करू शकतोच हि नम्र अपेक्षा ,
तुमचा
वारकरी संप्रदाय युवा मंच / गोरक्षक बंधू  .

जीवाला विषयाचीच गोडी वाटते .....


|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
जीवाला विषयाचीच गोडी वाटते ..

हे पहा पाहुणे,या ठिकाणी जर आता विंचू निघाला,त्‍याला म्‍हटले नांगी सरळ कर तो करेल का । जाऊ द्या,आपल्‍या मुख्‍यमंत्रयाने जरी नांगी सरळ करायला सांगितली तरी तो करणार नाही. विंचू ज्‍याला चावला त्‍याला गुदगुदल्‍या होतात का. ज्‍याला चावला त्‍यालाच माहिती. आहा हा हा किती विषारी. विंचवाने भांडयाला जर डंक मारला तर बोळ पडते. एवढा विषारी आहे. तला कोणीही सांगितले नांगी सरळ कर तर तो करणार नाही. पण देवाने येथे एक एकाहून बळी निर्माण केले, तोच विंचू पाल पाहिली की लगेच नांगी सरळ करतो.कारण ती पाल त्‍याला अख्‍खा गटट करते. मग पालीलाही अभिमान झाला. एक पट विंचवाच विष पचायला दोन पट पाल. परंतु तीलाही अभिमान झाला,तर देवाने तिसरा प्राणी तयार केला कोंबडूबाई. ती कोंबूडबाई त्‍या पालीला आख्‍खी खाते. तीन पट पालीचं विष पचवायला सहा पट कोंबडीमध्‍ये विष आहे. ती कोंबडी दिवसभर उकरते परंतू पोट काय भरत नाही, हे लहान लहान मुले रस्‍त्‍याच्‍या कडेला बसतात. पहि त्‍याच्‍यावर ताव मारते आणि अशी विषारी असणारी कोंबडी पचवायला किती पट विष पाहिजे. आणि त्‍या कोंबडीलाही अभिमान झाला तर देवाने पहा ना ती कोंबडी कोण खातं. या देशातले सुशीक्षित विचारंत अशी विषारी कोंबडी खातात. सांगा पाव्‍हणे किती विषारी असतील व म्‍हणून तर या ठिकाणी मेळ बसत नाही.

सिध्‍दांत - काय खावं आणि काय खाऊ नये. काय प्‍यावं आणि काय पिऊ नये हे सुध्‍दा आम्‍हाला कळत नाही. इतके आम्‍ही विषयाधीन झालो. म्‍हणून तर देवाचा संबंध आम्‍हाला कळत नाही. मनुष्‍य म्‍हणून जन्‍माला येऊन सुध्‍दा आम्‍ही माणसासारखे वागत नाही.

प्रमाण - १) विषय ओढी भुलले जीव । कोण करीत त्‍यांची कीव । न उपजे नारायणी भाव । पावोनी ठाव नरदेह ॥ तुकाराम महाराज ॥
२) वेदे न करीता प्रेरणा । विषयावरी सहज वासना । स्‍वभावे सकळ जना । अनिवार्य ॥ भागवत॥

तुमचा 
अक्षय भोसले ,
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र राज्य