Saturday 29 August 2015

प.पू.माऊली शान्तिमाँ पजवानी - पुण्यस्मरण तथा अनमोल वचन

।। श्रीगुरु ।।
पूज्य श्रीगुरु महंत प्रमोदमहाराज जगताप यांनी आजवर अनेक संतचरित्रे वचण्याची सुचना केली गुरु आदेश म्हणून शक्य तितका नक्की प्रामाणिक प्रयत्न त्या पैकी एक
"प.पू.माऊली शान्तिमाँ पजवानी " याचं जीवन चरित्र

शान्तिमाँ यांची गुरुपरंपरा
।।आदिनाथ भगवान ।।
सदगुरु ज्ञानेश्वरमहाराज
सदगुरु गुंडामहाराज देगलूरकर
सदगुरु पंढरीनाथमहाराज श्रीगोंदेकर
सदगुरु श्रीकृष्णानंदमहाराज केणे
सदगुरु नारायणमहाराज श्रीगोंदेकर
पू. शान्तिमाँ पजवाणीजी
पूज्य महाराज यांनी मला त्यांच्या जवळील " परमार्थ  प्रकाश  "नामक पुस्तक आशीर्वादपर भेट दिल . शान्तिमाँ अणि त्यांचे शिष्य प्रभाकरजी माने यांच्यातील पत्रव्यवहार अस स्वरूप , एकूण ४० पत्रांच् संकलन यात आहे . पूजनीय माँ यांनी त्यांच्या पत्रातून अभूतपूर्व अध्यात्म , वेदांत , भक्तिशास्त्राचे प्रगट ज्ञान  आदि अत्यंत सहजपूर्वक मांडल आहे . त्याच पुस्तकातील शान्तिमाँ यांचे काही अनमोल वचन  आज त्यांच्या पुण्यस्मरणानिम्मित आपल्या पर्यन्त पोहवचवण्याचा हा छोटा प्रयत्न .
०१) जप करणे आपले काम - जप मोजण्याचे काम प्रभुवर सोपवा .
०२) संपत्ती पांच साधनांनि प्राप्त होते
प्रारब्ध / प्रभुकृपा / गुरुकृपा / आई वडिलांचा आशीर्वाद / व्यवसाय
०३ ) आपली विषयाची भूक कमी करा , म्हणजे भगवंताची भूक वाढेल .
०४)"सर्वांच्या सुखात आपले सुख असुन सर्वांच्या दुःखात आपले दुःख आहे " हे सत्य लक्षात घेऊन माणसाने जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर मानवी जीवनात सुखाचा सुकाळ झाल्याशिवाय राहणार
नाही .
०५)माणूस जन्माने मोठा होत नाही तर तो कर्तव्याने मोठा होतो.
०६)परमात्मा अंतरात्म्यात आहे त्याला पहा . दृष्टि प्रेममय ठेवा तरच सृष्टि प्रेममय दिसेल .
०७) माणूस नामांत रंगला म्हणजे सदगुरु कृपा करतात .
०८)दुसऱ्याला आकंठ खायला घालून तो तृप्त झालेला पाहणे , यातला आनंद अवर्णनीय असतो .
०९) प्रपंच मनापासून करावा , पण खरी ओढ भगवंताकड़े असावी
१०)सदगुरुंची भेट होणे या पेक्षा अधिक महत्त्वाचे काहींच नाही .
११)'नामब्रह्न' व 'नादब्रह्म' यांचा ज्या वेळी संयोग होतो त्यावेळी प्रभुला प्रगट व्हावेच लागते .
१२ )लोक शरीराची - कातडीची फार चिकत्सा करतात पण आत्म्याची चर्चा कोणी करत नाहीत.
१३) देव जसा दयाळु आहे तसा न्यायी पण आहे , हे विसरु नका .
  १४) सतत नामात राहिले म्हणजे देह सोडताना दुःख वाटत नाही .
१५) तळमळ असेल तर नामस्मरणासाठी एकांत काढता येतो .
१६) अन्नदानाने हात,
तीर्थयात्रेने पाय ,
नामस्मरणाने मुख ,
आणि शरणागतीने चित्त पवित्र होते .
१७) जसे आपन पैसाचे ध्यान करतो तसे परमेश्वराचे ध्यान केले पाहिजे .
१८)प्रेम मागू नका - त्याची अपेक्षा करु नका . प्रेम दुसऱ्याला द्यायला शिका .
आदि अनेक 
या पुस्तकाच्या मुख्य पाना वर लिहलेले एक मला आवडल ते म्हणजे मूल्य - सदगुरु सेवा
शान्तिमाँ यांच्या जीवना संदर्भातील साहित्य आपणास अवश्य प्राप्त होतील .
प्राप्ति स्थळ :
श्री सत्संग मंडळ ,
बंदररोड , डहाणू ४०१६०१
संकलन
अक्षय चंद्रकांत भोसले
०८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र
varkariyuva.blogspot.in

लक्ष्मणासारखा भाऊ सापडणार नाही - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
         वाचिक जपापेक्षा उपांशू जप श्रेष्ठ तर उपांशूपेक्षा मानसिक जप श्रेष्ठ आहे. कारण मानसिक जप हा प्रभू रामापर्यंत घेऊन जाण्याचे साधन आहे. हे रामस्मरण केल्याने जन्म-मरण संपते म्हणून कोणतेही कार्य करण्याअगोदर रामनामस्मरण करावे. सीतेसारखी दुसरी पत्नी या मृत्युलोकात मिळू शकेल; मात्र लक्ष्मणासारखा दुसरा भाऊ या जगात शोधूनही सापडणार नाही, असे प्रभू रामचंद्राने म्हटले असल्याचे प्रतिपादन ह. भ. प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थानतर्फे आयोजित 'अध्यात्म रामायण' प्रवचनमालेत ते बोलत होते. दशरथांच्या तीन राण्यांच्या पोटी राम, लक्ष्मण, भरत व शत्रुघ्न हे चार अलौकिक पुत्र अवताराला आले. संपूर्ण अयोध्या नगरी रामनामात तल्लीन झाली. योगी, मुनीवर ज्या नामात रमतात ते नाव राम असल्याने वसिष्ठ ऋषींनी हे नाव निवडले तर नवमीला प्रभुरामाचा जन्म झाल्यानंतर दशमीला सुमित्रेच्या पोटी लक्ष्मणाचा जन्म झाला. शोभा, सौंदर्यवान, दास्यवती, लक्ष्मीयुक्त म्हणून वसिष्ठांनी त्याचे नाव लक्ष्मण ठेवले. राक्षसी सुवर्ण मृगामागे जाऊ नये म्हणून लक्ष्मणाने केलेली विनवणी, सुग्रीवाने दिलेले दागिने ओळखणे, राम-सीतेपैकी कोणाचे पाय सुंदर या प्रश्नाचे अलौकिक उत्तर सृष्टीच्या निर्मात्याला सीतेसाठी व्याकूळावस्थेत असताना लक्ष्मणाने केलेली सोबत लक्ष्मणाच्या गुणांची महती हे सगळ्य़ात महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२