Monday 28 July 2014

भगवान विष्णू आणि भगवान शिवजी यांची एकरुपता दर्शवणारा आणि शिव नामाच महत्त्व सांगणारा अभंग

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


भगवान विष्णू आणि भगवान शिवजी यांची एकरुपता दर्शवणारा आणि शिव नामाच महत्त्व सांगणारा अभंग :- 

शिव ऐसा शब्द कल्याणदायक । जाणती भाविक साधुजन ॥१॥
तारक हें नाम भोळ्याभाविकांसी । नेणते जाणत्यांसी लाभ एक ॥२॥
उपमन्यु बाळक दूध मागों गेला । क्षीरांब्धि दिधला उचितासी ॥३॥
दुष्टदुराचारी पतित तारिले । नाही आव्हेरिलें दीनानाथें ॥४॥
नामा म्हणे शिव विष्णु एकरूप । ताराया अमूप अवतार ॥५॥
- श्री संत नामदेव महाराज

Sunday 27 July 2014

श्रावण महिना प्रारंभ :)

|| ज्ञानेशो भगवान विष्णू || 

श्रावण महिना प्रारंभ  


शिव भोळा चक्रवर्ती।
त्याचे पाय माझे चित्ती॥
वाचे वदता शिवनाम।
तया न बाधी क्रोधकाम॥
धर्म अर्थ काम मोक्ष।
शिवा देखता प्रत्यक्ष।
एका जनार्दनी शिव।
निवारी कळिकाळाचा भेव॥
- संत एकनाथ महाराज

Monday 21 July 2014

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पदार्थविज्ञान विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील पदार्थविज्ञान विषयक संदर्भ ! 
गीतेच्या या प्राकृत टीकेचे सार्थक होण्यासाठी ' लक्ष देऊन ऐकावे ' अशी श्रोत्यांनी विनंती करताना श्री ज्ञानराज म्हणतात ,
तिये अवधान द्यावे गोठी | बोलिजेल नीट मऱ्हाटी |
जैसी कानाचे आधी दृष्टी | उपेगा जाये ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ७-२०६
श्रोत्यांनी अवधानपूर्वक ऐकले तर ज्याप्रमाणे कानाच्या आधी दृष्टी उपयोगी पडते ( ऐकायला येण्यापूर्वी दिसते ) , तसे माझ्या या मराठी बोलण्याचे होईल . प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा जास्त असतो त्यामुळे आपल्याला दूरची गोष्ट आधी दिसते मग ऐकायला येते हे वैज्ञानिक सत्य उपमा म्हणून वापरले आहे .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Friday 18 July 2014

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील धातुशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील धातुशास्त्र विषयक संदर्भ ! 
चित्त शुद्ध करण्याकरिता सत्कर्म आवश्यक असतात हे सांगण्यासाठी उपमा देतात ,

भांगार आथी शोधावे | तरी आगी जेवी नुबगावे |
का आरिसयालागी साचावे | अधिक रज ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१४०

सोने ( धातु -Metal )शुद्ध करायचे असेल तर अग्नीचा कंटाळा करून चालणार नाही . अर्थात धातु हे अग्नीच्या सहाय्यानेच शुद्ध होतात .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील वनस्पतीशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||



     श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीत आलेले वनस्पतीशास्त्र विषयक संदर्भ ! 
परमेश्वरच्या संकल्परुपी बिजामधून हि सृष्टी निर्माण झाली आणि पुन्हा ती त्या संकल्पाताच सामावणार आहे . ( सृष्टी उत्पत्ती आणि लय ) हे सांगताना म्हटले आहे , 
बीज शाखाते प्रसवे | मग ते रुखपण बीजी सामावे |
तैसे संकल्पे होय आघवे | पाठी संकल्पी मिळे || 
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ९-२९२ 
ज्याप्रमाणे बी मधून खोड , मुळे , फांद्या इत्यादी सर्व झाड जन्माला येते आणि पुढे ते झाड लहानशा बी मधे सामावून जाते त्याप्रमाणे ...
( असाच विषय ' बीज मोडे झाड होये | झाड मोडे बीजी समाये | ' ..-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १७-५९ येथे हि आहे )
भाजलेले बी उगवत नाही ' बीजे सर्वथा आहाळली | .... तरी न विरुढती सिंचली |...
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी २-६६
पुढे पंधराव्या आध्यायात ' उर्ध्वमूलमध : शाखम ' यावर भाष्य करताना वनस्पतीशास्त्रातील बीजभाव , बीजांकुरभाव वृद्धी , फलभाव , पानझड इत्यादी अवस्थांचे सविस्तर वर्णन केले आहे .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

मुंबई अग्निशामक दलाचे " शहीद नितीन इवलेकर " यांना मानाचा सलाम - वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

   मुंबई अग्निशामक दलाचे " शहीद नितीन इवलेकर " यांना मानाचा सलाम !                



                आज दुर्दैवी घटना घडली मुंबईत अंधेरीतील लोटस बिझनेस पार्कमध्ये लागलेली आग विझवण्यासाठी इमारतीत गेलेला अग्निशामक दलाचा एक जवान नितीन इवलेकर शहीद झाला. या घटनेत २१ जवान जखमी आहेत , नितीन मित्रा तुझे हे धाडस आम्ही सदैव लक्षात ठेवू आमच्या साऱ्या मुंबईकरांच्या तू सदैव स्मरणात राहशील . शूरा मी वंदितो ! ;'( समस्त वारकरी संप्रदाय तथा मुंबईकर यांच्या वतीने तुला भावपूर्ण आदरांजली ! 
                         युवकांनो पहा आजचा या युवाने धाडस केल शेवटी जिंकला मात्र स्वत: ला मात्र हरवून बसला .गड आला पण सिह गेला अगदी असच काहीस घडल आमच्या नितीन इवलेकर यांच्या समवेत ! आपण हि हाच आदर्श घ्यावा कि आपल्या कार्याकरिता जीवाची बाजी लावायला पण आपण तत्पर असल पाहिजे हाती घेतलेले काम पूर्ण केलच पाहिजे .
तुझ्या या शुर बाळाला प्रणाम ! हे भारत माता तुझ्या खुशीत तुझ्या या मुलाला सामवून घे .

शूरा मी वंदितो ! नितीन इवलेकर अमर रहे ! शूरा मी वंदितो ! शूरा मी वंदितो !

शोकाकुल
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र परिवार

श्री ज्ञानेश्वरीतील आरोग्य / शरीरशास्त्र विषयक संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या ज्ञानेश्वरीत आलेल आरोग्य / शरीरशास्त्र विषयक संदर्भ आपल्यापुढे मांडण्याचा आमचा छोटा प्रयत्न ! 

श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आदर्श औषध कोणते याचा उल्लेख केलेला आहे .
जैसे रसौषध खरे | आपुले काज करूनि पुरे |
आपणही नुरे | तैसे होतसे ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१०७९
ज्या प्रमाणे खरे औषध आपले रोग्निवारणाचे अपेक्षित कार्य पूर्ण करून स्वत : ही संपून जाते , त्याचा कोणताही अन्य परिणाम ( side effect ) होत नाही . ( त्याप्रमाणे ब्रह्मप्राप्तीनंतर साधनाची आवशक्यता संपते )
जीव भावासाठी पंचमहाभूतांचे केवळ पंचीकरण होऊन पुरत नाही तर पचीकरण होऊन पुरत नाही तर पंचीकरणा बरोबर ज्यावेळेस अहंकाराची उपलब्धी होते , त्यावेळेस पंचमहाभूते जीवभावास प्राप्त होतात . हे सांगताना म्हटले आहे ,
जैसा ज्वरु धातुगतु | अपथ्याचे मिष पहातु |
मग जालिया आतु | बाहेरी व्यापी ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १३-८०
जंतुसंसर्ग झाल्यावर लगेचच काही रोग होत नाही तर काही अपथ्य झाल्याच्या निमित्ताने शरीराची प्रतिकारक्षमता कमी झाल्यावर रोग होतो .
आपण स्वीकारलेल्या अन्नाप्रमाणे शरीर आणि मन- बुद्धी बनत जाते . यासाठी अन्नशुद्धीही महत्त्वाची असते .
तेवी जैसा घेप आहारु | धातु तैसाचि होय आकारू |
आणि धातु ऐसा अंतरु | भावो पोखे ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १७-११६
सेवन केलेल्या अन्नाच्या गुणांप्रमाणे शरीराला बल प्राप्त होते आणि अंत : करणही त्यानुसार बनत जाते ..
                 संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                  आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र

ज्ञानेश्वरीतील भौगोलिक संदर्भ - शास्त्रज्ञ संत श्री ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||.

भौगोलिक संदर्भ 


अठराव्या आध्यायात , माणसाच्या शरीरात निरनिराळ्या प्रकारची कार्ये करणाऱ्या वायुत्त्वाच्या स्वरूपाविषयी म्हटले आहे , 

आणि पूर्वपश्चिमवाहणी | निघलिया वोघाचिया मिळणी |
होय नदी नद पाणी | एकचि जेवी ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१३१

ज्याप्रमाणे पूर्वेला वाहणारी नदी असो किंवा पश्चिमेला वाहणारी नदी असो , लहान नदी असो वा मोठा नद असो त्याचे पाणी एकाच समुद्राला जाऊन मिळते ,
(त्याप्रमाणे निरनिराळ्या इंद्रियांच्या द्वारे एकच प्राणशक्ती कार्यरत असते. )
आपल्या देशातल्या चार प्रमुख महानद्यांच विचार केला तर त्यापैकी गंगा , गोदावरी आणि कावेरी या पूर्व समुद्राला , गंगासागराला ज्याला बंगालचा उपसागर असे म्हटले जाते त्याला आणि नर्मदा हि पश्चिम समुद्राला सिंधू सागराला ज्याला अरबी समुद्र म्हटले जाते त्याला मिळतात .
भारता भोवती असलेले हे तीनही समुद्र वास्तविक एकच आहेत . पृथ्वीसाठी ' भूगोल ' हा शब्द अनेक ठिकाणी वापरलेला आहे .
उदा .
' .....भूगोलु हा || '
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १०-७०
किंवा

' तरि भूगोलुचि काखे सुवावा ..'
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १०-२६०

निगिजे पुर्विलिया मोहरा | की येईजे पश्चिमेचिया घरा |
निश्चळपणे धनुर्धरा | चालणे एथिंचे ||
-- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ६-१५९
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य समझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Thursday 17 July 2014

श्री ज्ञानेश्वरीतील लोहचुंबकिय संदर्भ - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


 श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील लोहचुंबक संदर्भ आपल्या पुढे मांडण्याचा आमचा हा प्रयत्न्न !


लोहचुंबका विषयी श्री ज्ञानेश्वरीत काही उपमा आलेल्या आहेत , परमेश्वर प्रकृतीचा ( मुळमाया ) अंगीकार केला कि सृष्टीचा उत्पत्ती होते , परंतु याचा परमेश्वराला काहीही शीण होत नाही , हे सांगताना उपमा देतात ,
                    जड परि जवळिका । लोह चळे तरि चळो कां ।
                     कवणु शीणु भ्रामका । सन्निधानाचा ॥
                                         - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ९-११६
लोखंड जड असूनही लोह्चुबंकच्या जवळ खेचले जाते , त्याच्या या खेचले जाण्याचा लोहचुंबकाला कोणता त्रास होतो ? अर्थात कोणताही त्रास होत नाही . त्याप्रमाणे परमेश्वराला या सृष्टीचा , व्यवहाराचा काही शीण नाही .
      तेराव्या अध्यायात क्षेत्र क्षेत्रज्ञानाविषयी सांगताना दृष्टांत देतात ,
                             संसर्गे चेष्टिजे  लोहे | परि लोह भ्रामक नोहे |
                            क्षेत्र क्षेत्रज्ञा आहे | तेतुला पाडू ||
                            - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १३-११२२
ज्याप्रमाणे लोहचुंबकाच्या सानिध्यात लोखंडहि चुंबकासारखे होते . परंतु लोखंड काही चुंबक नसते , त्याप्रमाणे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांच्याविषयी समजावे .
                  अठराव्या अध्यायात हि ईश्वरी सत्तेने भूत मात्रांचे व्यवहार होतात हे सांगतानाही लोहचुंबकाचि उपमा दिली आहे ,
                        भ्रामकाचेनि संगें । जैसें लोहो वेढा रिगे ।
                          तैसीं ईश्वरसत्तायोगें । चेष्टती भूतें ॥
                                                   - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८-१३११
 जसे लोखंड लोहचुंबकाच्या सामर्थ्यामुळे हालते , फिरते , तसे ईश्वराच्या सत्तेने जड असलेल्या भूतमात्रांच्या हालचाली होतात .
                            संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                           आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र
                                 -

१२ व्या शतकात सांगितले खगोलशास्त्र - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

 
      अकराव्या अध्यायाच्या आरंभी या अध्यायामधे शांत आणि अद्भुत रस एकत्र आले आहेत हे सांगताना म्हटले आहे ,
                          नातरी अवसेचा दिवशी | भेटली बिंबे दोनी जैशी |
                          तेवी एकवळा रसी | केला एथ || - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी ११-०५
 अमावस्येच्या दिवशी चंद्र आणि सूर्य पृथ्वीच्या एकीकडेच असतात , जणू काय ते एकमेकांना भेटतात .( त्याप्रमाणे  शांत आणि अद्भुत हे दोन्ही रस या अध्यायात एकमेकांना भेटले आहेत )
                   वद्य पक्षात कमी कमी होत अमावस्येला रात्री चंद्र संपलेला नसतो तर त्या दिवशी तो सूर्याबरोबरच उगवतो , मावळतो , त्यामुळे अमावस्येला रात्री आकाशात चंद्र दिसत नाही , हे वैज्ञानिक सत्य सांगितले आहे .
                    चंद्राच्या दिसणाऱ्या कला या दृश्यभास असतात म या कला चंद्र , सूर्य आणि पृथ्वी यांच्या परिभ्रमणामुळे बदलणाऱ्या जागांच्या परस्पर सापेक्षतेच्या परिणामाने दिसतात , चंद्र आणि त्यांच्या या कलांचा हा संकेत भगवंताचे समत्व सांगताना उदाहरण म्हणून सांगितला आहे .
                  हा गा पूर्णिमेआधी कायी | चंद्र सावयवुचि नाही |
                        परी तिये दिवशी भेटे पाही | पूर्णता तया ||          
                                                          - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी १८ - ११२७
पुर्निमेआधी चंद्राचे पूर्णबिंब दिसत नसले तरी चंद्रबिंब पूर्ण नसते काय ? अर्थात असतेच . पण पुर्निमेच्या दिवशी त्याचे  पूर्णबिंब दिसते
                संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                          आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र
             

आकाशाचा रंग निळा हा केवळ भास :- शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||


पृथ्वीवरून आपल्याला आकाश निळे दिसते परंतु वास्तविक आकाश काही निळे नसते . पृथ्वीवरून दिसणारा तो एक आभास आहे हे हि ग्रंथराज ज्ञानेश्वरीत दोनी ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात सांगितलेले आहे .
निळिमा अंबरी | का मृगतृष्णालहरी |
तैसे वायाचि फरारी | वावो जाहले ||
- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी : १३-१०५
ज्या प्रमाणे आकाशाचा निळा रंग किंवा मृगजळाच्या लाटा वास्तविक नसतात , व्यर्थ असतात
( त्याप्रमाणे मन हा वायूत्त्वाचाच एक अभ्यास आहे . ) मुळात आकाशाचा रंग हा निळा नाही अस यातून प्रतिपादन होत .
वांझेच्या लेका | कैची जन्मपत्रिका |
नभी निळी भूमिका | के कल्पू पा ||
-श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वरी : १५-२३४
वांझेच्या मुलाची जन्मपत्रिका असते का ? किंवा आकाशाला निळा रंग असतो का ? अर्थात या दोन्ही गोष्टी अस्तित्वात नसतात , ( त्याप्रमाणे या संसारवृक्षाचे अस्तित्व जाणावे )
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद !
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र 

Wednesday 16 July 2014

सापक्षतेचा सिद्धांत - श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी

|| ज्ञानेशो  भगवान विष्णू ||
सापक्षेतेचा सिद्धांत माऊलींच्या ज्ञानेश्वरीत :)



 अथवा नावे हन जो रिगे । तो थडियेचे रुख जातां देखे वेगें ।
 तेचि साचोकारें जों पाहों लागे । तंव रुख म्हणे अचळ ॥
                                                     - श्री ज्ञानेश्वरी ४-९७
                                             नावेत बसून जाताना नदीच्या काठावरील झाडे धावताना दिसतात , परंतु खरे पाहिले तर ती स्थिरच असतात , कर्म आत्म्याकडून घडत नसून शरीराकडून ते घडत असते . कर्माचरण आभासात्मक आहे हे पटवून देताना ज्ञानेश्वरांनी प्रस्तुत दृष्टांत श्रोत्यांच्या पुढे ठेवला आहे . विज्ञानाच्या परिभाषेत हा " सापेक्षतेचा सिद्धांत आहे .
                                             केवळ प्रपंच ज्ञान एवढ्या मर्यादित अर्थाने ज्ञानेश्वरांनी विवेचन केले नसून , त्यातील ' सर्वसमावेशक ' अर्थ जाणून घेणे महत्वाचे आहे . दैनदिन व्यवहारातील आचारविचार  , नितीमुल्ये सर्व शास्त्रे ' प्रपंच विज्ञानात येतात असे ज्ञानेश्वरीतील बहुसंख्य दृष्टांतावरून लक्षात येते .
संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते .
                           आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र 

गो चिकित्सा आणि शिक्षण !

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
१० वी झाली , १२ वी झाली नंतर पुढे काय ? 

१० वी १२ वी झालेल्या युवा वर्ग गोभक्त यांना सुवर्णसंधी ! 
अभ्यासक्रम निवडताना वर्तमान / भविष्य पहा …..
१० वी १२ वी नंतर उच्च शिक्षण घेण हे काळाची गरज आहे , मात्र त्या सोबतच आपण आपली परंपरा वडिलोपार्जीत जमीन आणि घरचा अर्थात गावाकडील शेती व्यसाय , पशुपालन या कडे आपण दुर्लक्ष करतो . मात्र खर धन तर तेच आहे , जर शेती नसेल तर मग अन्न कोठून ? आज जी गो माता कि भारतातील प्रत्येक व्यक्ती तीच दुध पिऊन सुदृढ झाला अगदी तीच संकटात आहे ? खुले आम कत्तलखाने आहेत . अगदी हे सार थांबवायचं आहे न आपल्याला मग काही वेगळ केल पाहिजे गाईच्या संदर्भात शिक्षण घेतल पाहिजे , गाईपासून मिळणाऱ्या घटकांपासून उदा दुध , गोमुत्र शेन आदींपासून हाजारो उत्पादन करता येतात मात्र आपण आतापर्यंत गो मातेकडे अध्यात्मिक दृष्ट्या पाहत आलो गो मातेतील विज्ञान आपण पहिलच नाही कधी ! अगदी याच साऱ्या गोष्टी आपणास कळाव्यात म्हणून आम्ही आपानाकरिता भारत सरकार द्वारे प्रवर्तित राष्ट्रीय विकास केंद्र द्वारे काही कोर्स उपलब्ध करून देत आहोत अगदी आपल नेहमीच शिक्षण , काम धंदा करत करत आपणास ते हि पूर्ण करता येईल . गो मात हेच खर धन आहे ! आपल्याला एखाद्या गोष्टीतून जर आर्थिक फायदा असेल तर आपण लगेच करतो अगदी आपण कश्या प्रकारे आर्थिक दृष्ट्या सक्षम बनू शकाल विशेष करून माझा आजचा युवा वारकरी , माझे सर्वच युवा कीर्तनकार बंधू आपण नक्कीच याची दखल घ्यावी . आपण गो चीक्त्सिक एक प्रकारे वैद्य बनू शकता सर्व कोर्से हे स्वदेशी पंचगव्यम गुरुकुलूम संशोधन केंद्र , उज्जैन
भारत सरकार द्वारा प्रवर्तित राष्ट्रीय विकास केंद्र यांच्याशी संबधित आहेत आपणास त्याच प्रमाणपत्र उपलब्ध होईल व आपण हि या शिक्षणा द्वारे गाई शी संबधित लघु उद्योग सुरु करू शकता .
* MASTER DIPLOMA IN PANCHGAVYA THERAPY
* DIPLOMA IN PANCHGAVYA THERAPY
* CERTIFICATE IN PANCHGAVYA THERAPY
प्रवेशप्रक्रिया सुरु ..
प्रवेश प्रक्रिया अंतिम दिवस :- २५ जुलै २०१४

प्रशिक्षण ठिकाण :- मधु प्रमिला दंडवते संकुल
, मुंबई - गोवा द्रुतगती मार्ग ता - पनवेल , जि - रायगड , महाराष्ट्र

सविस्तर माहिती करिता आजच संपर्क करा .
श्री अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
श्री गोरक्षनाथ घाडगे - ९९८७७८१०४३
श्री तुकाराम सांगळे – ९८९२१६६४७०

वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

पृथ्वी चे सूर्याभोवती परिभ्रमण - शास्त्रज्ञ श्री संत ज्ञानेश्वर महाराज

|| ज्ञानेशो भगवान  विष्णू ||.
संत साहित्य आणि विज्ञान याची सांगड फार पूर्वीपासून चालत आली आहे , दुर्दैवाची गोष्ट आपण आपल्या परंपरे कडे विचारपूर्वक पाहतही नाही . लक्षात घ्या आपणच जर आपल्यापरंपरेचा अभ्यास केला नाही तर कोण करणार ? असो .

आम्हाला चवथ्या अध्याय वाचताना , श्री ज्ञानेश्वरीतील या वैज्ञानिक सिद्धांतांचे दर्शन ज्या ओविमुळे घडते ती ओवी , 
आणि उदो-अस्ताचेनि प्रमाणे। जैसे सूर्याचे न चलता चालणे। तैसे नैष्कर्म्यत्व जाणे। कर्मेचि असता॥ 
- श्री  ज्ञानेश्वरी ४-९९ 
कर्म करूनही , केलेले दिसूनही 'नैष्कर्म्य' कसे असू शकते हा विषय समजाऊन सांगताना श्री ज्ञानदेव म्हणतात , ज्याप्रमाणे आपल्याला उदय-अस्त असा सूर्याचा प्रवास , चालणे दिसते . परंतु प्रत्यक्षात सूर्य काही उगवतीकडून (पूर्वेकडून ) मावळतीकडे ( पश्चिमेकडे ) चालत नाही , त्याप्रमाणे कर्म करीत असतानाही नैष्कर्म्य अवस्था असू शकते हे जाणतो ..
 या ओवीमध्ये सूर्य उदय ते अस्त या प्रवासात सूर्य पूर्व क्षितिजाकडून पश्चिम क्षितिजाकडे फिरलेला प्रत्यक्ष दिसतो , असे दिसत असूनही प्रत्यक्षात सुर्याचे चालणे न चालता झालेले असते , असे स्पष्ट सांगितले आहे . ' न चालता सूर्याचे चालणे ' म्हणजेच सूर्य असा पूर्वेकडून पश्चिमेकडे चालत नाही . तो त्याच्या ठिकाणीच असतो . पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे होणाऱ्या परिभ्रमणामुळे आपल्याला तसे वाटते . या शास्त्रीय सत्याचाच उलेख्ख या उपमेमधे केलेला आहे .
 म्हणजे पृथ्वीच्या भ्रमणामुळे उदय -अस्त असे सूर्य फिरल्यासारखे वाटते . मग पृथ्वी गोल आहे आणि ती फिरते आहे याचे ज्ञान आपल्याकडे पूर्वी होते काय , याचे अन्य प्राचीन संदर्भ आहेत काय ? असा प्रश्न उपस्थित होतो 
आणि याचे उत्तर आहे , याचे प्राचीन संदर्भही आहेत !
 आपल्याकडे अनेक पुराने ( १८ महत्त्वाची पुराणे ) उपलब्ध आहेत . त्यांचा सामन्यत : काल ५००० वर्षापूर्वीचा आहे . दुर्दैवाने त्यांच्याकडेही आपण केवळ एक "रंजक कथा" म्हणून पाहतो . त्यांच्यामधेही  असे वैज्ञानिक संदर्भ आढळतात . जिज्ञासूसाठी प्रस्तुत प्रकरणाच्या विषयाचे दोन संदर्भ देतो त्यावरून आपल्या लक्षात येईल . सुप्रसिद्ध अशा श्रीमद भागवत महापुराणामधे कर्दम प्रजापतीने आपली पत्नी देवहुती हिला तत्कालीन विमानातून भूगोल दाखविला असा स्पष्ट निर्देश आहे  
 "प्रेक्षयित्वा भुवो गोलं " पत्‍न्यै यावान् स्वसंस्थया । बह्वाश्चर्यं महायोगी स्वाश्रमाय न्यवर्तत ॥ 
                             ( - श्रीभागवत ३-२३-४३ )

देवीभागवतामधेही स्पष्ट उलेख्ख आहे कि ,
 नैवास्तमनमर्कस्य नोदयः सवकदा सतः ॥
 उदयास्तमनाख्यंहि. दर्कनादर्कनं रवः ॥ (- देवीभागवत .८-१५-२४ )
सूर्य सर्वदा आहे तसाच सत्य आहे  , त्याला अस्त नाही , उदयही नाही .
सूर्य दिसायला लागला कि उगवला म्हटले जाते . दिसेनासा झाला कि मावळला असे म्हटले जाते अस अजून बरच गूढ आपल्या संत साहित्यात आह इमात्र आपण ते चीक्तसक रित्या अभ्यासल पाहिजे ,

संदर्भ: 

१. आर्यभटीय- गोलपाद 
२. आकाशाशी जडले नाते. डा. जयंत नारळीकर. (पृष्ठ २ व ३९)
३. "Birth and Early Development of Indian Astronomy - Dr. Subhash Kak
४.  Are Aryabhata’s and Galilean Relativity Equivalent? - Roopa H. Narayan
५. A Note on Aryabhata's Principle of Relativity- Abhishek Parekh
६ . भारतीय खगोलशास्त्राचा आद्य ग्रंथ: आर्यभटीय- डा. मोहन आपटे

                           संत साहित्यातील अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते . आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा ,     लवकरच भेटू नवीन विषय सोबत ,
खूप खुप धन्यवाद 
आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मच , महाराष्ट्र 










संत साहित्य आणि विज्ञान - आपली कालगणना

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||



अत्यंत प्राचीन संस्कृती असलेल्या आपल्या या राष्ट्राचा वैज्ञानिक शास्त्र परंपरेचा आपला दिव्य वारसा , एक अमुल्य धरोहर , या विषयी आपणा स्फार्शी काही माहिती नाही . आपली संस्कृती हि उपयोग शून्य , परलोकवादी , आणि काहीशी अध्यात्मिक तत्वांची चर्चा करणारी अशा प्रकारची होती , आहे . असे पाल्याला शिकवले जाते . परंतु हा दृष्टीकोण चूक आहे . आपली संस्कृती त्याग्पूर्ण उपभोग घेत इह - प्र्लोकीचे जीव्न्न समाधानी होण्यासाठी , आदर्श जीवनाची ओळख आणि प्राप्ती करून देण्यास्तही व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय सांगणारी आशी थोर परंपरा आहे , या उपक्रमाद्वारे आपल्या संस्कृतीकडे विशेषता: प्राचीन ग्रंथाकडे , आणि त्यातील वैज्ञानिक माहितीकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी , एक नवीन आयाम ( Dimension) प्राप्त व्हावी अशी अपेक्षा आहे .
यासाठी आम्ही श्री ज्ञानेश्वरीतील आढळलेल्या काही वैज्ञानिक सिद्धांतांची थोडशी चर्चा या स्थानी करीत आहोत .
आपल्याकडे श्री ज्ञानेश्वरी म्हणजेच श्रीमद भगवदगीतेचे भावार्थ दीपिका प्राचीन मराठी भाषेतील ओवीबद्ध टीका ग्रंथ , हा एक अद्भुत ग्रंथ आहे असे मानले जाते . मुख्यत : अध्यात्मिक , परमार्थिक क्षेत्रातल्या या ग्रंथात विज्ञानाच्या अनेक शाखा मधल्या सिद्धांत संदर्भ आढळतात , कि जे पाश्चिमात्य शास्त्रज्ञ यांच्या बद्दल , आणि त्यांच्या संशोधनाबद्दल संपूर्ण आदर ठेऊनही असे म्हणावेसे वाटते कि आपल्याकडे या सिद्धांतांची माहिती फार प्राचीन काळा पासून चालत आलेली होती . अशा काही गोष्टी आपल्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे .
श्रीमद्भगवत गीता किंवा ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे श्रेष्ठत्व , महात्म्य हा एक स्वतंत्र्य विषय होऊ शकेल , तथापि अगदी थोडक्यात सांगयचे तर ' नेमक काय करावे ' हे न समजणारा , गोंधळलेला अर्जुन हा आपणासारख्याच सर्वसामन्य माणसांचा प्रतिनिधी आहे , आपल्यापुढे अशा प्रकारची किंकर्तव्यविमूढ अवस्था अनेकवेळा असते . भ्रांतचित्त अशा अर्जुनाबरोबर भगवान श्रीकृष्ण समरांगणावर जी दिव्य चर्चा केली , जिचे संपादन महर्षी व्यास यांनी महाभारतात केले , ती म्हणजे श्रीमद्भगवत गीता . या गीतेमधील त्त्वज्ञानामुळे अर्जुनाचा वैचार्क गोंधळ संपला , आणि तो ' करिष्ये वचनं त्व ' असा निश्चय करून भगवत कार्य म्हणून केलेल्या महा संग्रामात विजयी झाला .
अत्यंत अर्थगर्भ असलेली संस्कृत भाषेतील हि गीता जनसामन्य यांना समजावी यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा भावार्थ प्राकृत अशा मराठी भाषेत ओविरुपात सांगितला . या ज्ञानेश्वरीचा मुख्य विषय जरी भगवतगीतेचा भावार्थ असला तरी त्याच्या अनुषंगाने विविध वैज्ञानिक सिद्धांत प्रगट दिसतात , त्याकडे माही जिज्ञासूंचे लक्ष वेधू इच्छितो .
हे वैज्ञानिक संदर्भ श्री ज्ञानदेवांना माहित होते असे म्हणणे आमच्या औध्दत्याचा भाग ठरू शकतो . कारण श्री ज्ञानदेव तर "ज्ञानियांचा राजा गुरु महाराव " असे जगद्गुरू श्री तुकोबाराय म्हणतात , त्यांना अज्ञात असे काही नसणारच , परंतु आम्हाला इथे म्हण्याचे आहे कि , हे वैज्ञानिक संदर्भ श्री ज्ञानदेवांच्या श्रोते यांना हि परिचित होते . कारण हे सगळे संदर्भ उपमेच्या स्वरूपात आढळतात . आणि अपरिचित गोष्टींची उपमा उपयोगाची नसते , उपमा हि परिचित गोष्टींची असली पाहिजे हे अगदी स्पष्ट आहे .
सर्व प्रथम आपण श्री ज्ञानदेवांच्या काळाचा विचार करू , ग्रंथाचा समारोप करताना अस लिखाण उपलब्ध आहे कि ,
शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें |..... ( ज्ञानेश्वरी अध्याय १८ / १८१० )
शके १२१२ म्हणजे युगाब्ध ४३९२ . सामन्यपणे इसवीसन १२९० . याचा विचार करण्याचे कारण म्हणजे पाश्चात्य शास्त्रज्ञानांचा काल आणि श्री ज्ञानेश्वरी काल यानाचा तौलनिक विचार केला पाहिजे . ' निकोलस कोपर्निकस ' , ज्यांचा जन्म इ.सन.१४७३ चा त्यांचे संशोधन ' कोमेंट्रीऑल्स ' सन १५३३ मध्ये किंवा ' रीव्होल्यूशनिबस ' हा ग्रंथ इ.सन.१५४३ मधला . श्री ज्ञानेश्वरी नंतर सुमारे २४३ वर्ष ' योहान केप्लर ' जन्म इ.सन. १५७१ यांचेच समकालीन ' गलिलिओ ' , ज्यांनी पृथ्वी फिरते असे संगीतले त्यांचा कालावधी श्री ज्ञानेश्वरी नंतर २८१ वर्षे , गुरुत्व आकर्षण सिद्धांत मांडणारे ' आयझक न्यूटन ' ज्यांचा सिद्धांताचा ग्रंथ " प्रींकपिया " प्रकाशित झाला , त्याचा कालावधी इ.सन.१६६६ ते १६८५ म्हणजे श्री ज्ञानेश्वरी नंतर ३७६ वर्षे . ' अल्बर्ट आईन्स्टाइन ' यांनी विविक्षित सापेक्षता सिद्धांत ( Special Relativity ) सांगितला इ.सन.१९०५ मध्ये आणि व्यापक सापेक्षता ( General Relativity ) सिद्धांत सांगितला इ.सन.१९१५ मध्ये . हा कालावधी "श्री ज्ञानेश्वरी "नंतर ६१५ वर्षे .
आजकाल २१ व्या शतकाच्या गोष्टी केल्या जातात , पण आपण विसरलो आहोत आपले कलियुगाचे ५२ वे शतक चालू आहे . कालमापनाची आपली प्रचीत पद्धत शालिवाहन शक नाही . युगांची वर्षे अर्थात युगाब्द मोजण्याची आपली पद्धती आहे . चार युगांचे एक युगचतुष्क म्हणजे मानवी ४३ लक्ष २० सहस्त्र वर्षे . ज्यातील चार युगांची वर्षे पुढील प्रमाणे आहेत , पहिले कृतयुग १७,२८,००० वर्षे . दुसरे त्रेतायुग १२,९६,००० वर्षे , द्वापारयुग ८,६४,००० वर्षे आणि चवथे कलियुग ४,३२,००० वर्षे , या आपल्या गणनेप्रमाणे कलियुगाचे ५१०७ वे वर्ष चालू आएह ,कालमापनाची व्याप्ती केवढी आहे , हे जाताजाता लक्षात घ्या , आपल्याकडे एक परमाणु म्हणजे सामान्यत : १.०९७४ * १०'-५ सेकंद इथपासून आदिशक्तीचे आयुष्य ३.७६०५*१०'५३ पर्यंत विचार उपलब्ध आहे म्हणजे जवळपास ५८ दशमस्थानंचा विचार उपलब्ध आहे , अशा अत्यंत प्राचीन परंपरेचा वारसा असणारे आपण आहोत , आजची युवा शक्ती एकत्र आली पाहिजे आपल्या संत साहित्यात जितक ज्ञान आहे तितक जागच्या पाठीवर कुठेच उपलब्ध नाही .
तळमळ इतकीच कि आपण सर्वांनी आपल संत साहित्य वाचल पाहिजे
मुळात हे सर्व " श्री ज्ञानेश्वरीतील विज्ञान दर्शन अर्थात वैज्ञानिक सिद्धांताचे संदर्भ "
आदरणीय नीलकण्ठ अनन्त आठवले जी
श्री वरदानंद भारती प्रतिष्ठान , श्री क्षेत्र पंढरपूर आणि असंख्य संत साहित्य गाढे अभ्यासक यांच्या पुस्तकात उपलब्ध आहे मात्र ते आजतागायत अनेकांपर्यंत पोहचल नाही कारण ते पुस्तक जे वाचेल त्यांच्या पर्यंत फक्त पोहचत मात्र तेच अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते . आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच नवीन सिद्धांतासोबत भेटूयात .
आपला
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र


संत साहित्य आणि विज्ञान - अक्षय भोसले

संत साहित्य आणि विज्ञान !
लवकरच ज्ञानेश्वरीतील तात्विक आणि त्यातील विज्ञान असे काहीस नक्कीच आपल्या पुढे मांडू लिखाण संकलन सुरु आहे वैज्ञानिक सिद्धांतांचे संदर्भ अनेक ज्ञानेश्वरीत आलेत आपण चीक्त्स्क रित्या ते पाहत नाहीत आजची युवा पिढी या माध्यमातून तरी का होईना संत साहित्य वाचेल व त्यातील त्यांची रुची वाढेल हा आमचा यातून प्रयत्न राहील .
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२  
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र 

Friday 11 July 2014

मासिक || वैष्णव दर्शन || आपल्या सेवेत - अक्षय भोसले

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||



सप्रेम जय हरी !,
मागील अनेक दिवस आपण आपल्या वारकरी संप्रदायाच्या  मासिकाच्या नोंदणी करिता प्रयत्नशील होतो आणि आजच त्याच नाव वैष्णव दर्शन म्हणून भारत  सरकारच्या वृत्तपत्र कार्यालयातून आले आहे
आपण
१) वैष्णव दर्शन
२)वैष्णव संदेश
3)संतबोध
 अशी नावे पाठवली होती त्या पैकी
" वैष्णव दर्शन "  या नावावर मोहर लावण्यात आली , आता लवकरच ते आपल्यापुढे आम्ही सर्व आपल्यापुढे मांडू . वारीकारी युवा मंच , महाराष्ट्रातील सर्वच युवावर्ग यात सामील असेल .
आत फक्त काही वेळ प्रतीक्षा अनेक मान्यवर लेखकांचे लेख हि उपलब्ध झाले आहेत , दीपावलीच्या शुभ मुहर्तावर ते आपणा सर्वांपर्यंत पोहचेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या पर्यंत आपल मासिक जाईल अशी अशा  बाळगतो , आत फक्त आपल्या सहकार्याची अपेक्षा .
वैष्णव दर्शन मासिकाची वार्षिक  सभासद वर्गणी केवळ २५० रुपये इतकी आहे .
आपण सर्वांनी आपल्या जवळील वारकरी युवा मंच च्या समन्वयक यांच्या शी संपर्क करून आपली नोंदणी करून घ्यावी व या ज्ञानअमृताचा मासिकाच्या माध्यमातून लाभ घ्याव हि विनंती .

    वारकरी , वैष्णव , भगवतभक्तांच्या सेवेत ...
                                       मासिक
                                                    || वैष्णव दर्शन ||
                                      वारकरी , वैष्णव , भगवत संप्रदायाचे एकमेव मुखपत्र
    ठळक वैशिष्टये
 * संपूर्ण महाराष्ट्रातील संप्रदायाच्या घडलेल्या व घडणाऱ्या कार्यक्रमाचा व उपक्रमाच्या बातम्या
 *संप्रदायातील सर्व फडांची , संस्थांची माहिती व परंपरा इतिहास
 *संप्रदायातील साधु ,संत व महाराज यांची माहिती व कार्य
 *संप्रदायातील कीर्तनकार , प्रवचनकार , गायक , वादक यांची सचित्र माहिती
 *संप्रदायाचे संत व तीर्थ क्षेत्रे  यांची विस्तृत माहिती
 *अध्यात्म - भक्ती वेदांत ज्ञान ( श्रीमदभगवतगीता , ज्ञानेश्वरी , गाथा , भागवत , दासबोध , रामायण     व दृष्टांत कथा )
 *समाजकारण , राजकारण व धर्मकारण यांचा त्रिवेणी संगम
 *आरोग्य  - योग प्राणायम , आयुर्वेद - भारतीय चिकित्सा
 *गोपालन सेवा - पंचगव्य चिकित्सा  माहिती , अभ्यासक्रम आदींचा अभ्यास
 *प्रखर  राष्ट्र व धर्मभक्तीचा प्रसार                                                        
  वार्षिक सभासद वर्गणी :- २५० रु . फक्त  

                                                     
     Website :- www.varkariyuva.blogspot.in                                
          Email :- varkariyuva@gmail.com

आपला ,
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२
मुख्य संपादक -  " वैष्णव दर्शन " मासिक

Thursday 3 July 2014

रयत शिक्षण संस्थेचे मॅाडर्न स्कूल , वाशी यांद्वारे आषाढी एकादशी वारी निम्मित आयोजित व्यख्यान माला " संत साहित्य आणि विज्ञान "

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

नवी मुंबई येथील रयत शिक्षण संस्थेचे मॅाडर्न स्कूल , वाशी यांद्वारे आषाढी एकादशी वारी निम्मित आयोजित व्यख्यान माला

" संत साहित्य आणि विज्ञान "

सहभाग :
१ ) अक्षय भोसले - प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू संस्कृती !
२ ) नीलम चव्हाण - BE in Electronics & Telecommunication Engineering

शालेय मुलांवर जसे आता संस्कार होतील तेच संस्कार शिकवण ते आयुष्यभर जोपासतात या करिता प्राचार्य श्री विनयकुमार हानशी यांनी हा अभिनव उपक्रम विद्यार्थी वर्गापुढे ठेवला आहे .
आपणा सर्वांस हि सस्नेह निमंत्रण ..!
 —