|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पत्र :-
प्रती ,
विभागीय व्यवस्थापक ,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ ,
मुंबई .
राम कृष्ण हरी !
विषय : बोरीवली ते आळंदी या मार्गावर एस.टी.बस सेवा सुरु करण्याबाबत .
महोदय ,
मुंबई पूर्व-पश्चिम उपनगर , ठाणे , नवी मुंबई या परीसरात वारकरी संप्रदायातील भाविकांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे . हे भाविक आषाढी , कार्तिकी तसेच प्रत्येक महिन्याच्या एकादशीच्या निम्मिताने आळंदी-देहू येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या तसेच संत श्री तुकाराम महाराज यांच्या दर्शनाकरिता वारी करतात .
मुंबई पूर्व- पश्चिम उपनगर , ठाणे , नवी मुंबई या भागातून महाराष्र् राज्य परिवहन महा मंडळाची देहू- आळंदी येथे जाण्यास थेट सुविधा नाही . त्यामुळे भाविकांना मुंबईहून पुणे अथवा स्वारगेट येथे जाऊन एस.टी.महामंडळाची किंवा पुणे महानगरपालिकेची दुसरी बस पकडावी लागते .
या निवेदनाद्वारे आपणास आम्ही विनंती करतो कि , आपण बोरीवली-पवई-भांडूप-ठाणे-नवी मुंबई(मार्गे कोपरखैरणे)-पनवेल-देहू-आळंदी ते परत बोरीवली या मार्गावर एस.टी.बस सेवा सुरु करावी. या सुविधेचा लाभ मुंबई परिसरातील सर्व वारकरी वर्गास होईल व ते आपले ऋणी राहतील .
धन्यवाद !
आपले स्नेहांकित
संपर्क :- अक्षय चंद्रकांत भोसले : ०८४५१८२२७७२