Friday 17 January 2014

फलटण येथे कत्तलखाना होऊ देणार नाही - वारकरी संप्रदाय युवा मंच


|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||

उठा  वैष्णवांनो  हिंदुनो वारकरी बंधू भगिनीनो  राष्ट्रभक्तानो समाजसेवकानो शेतकऱ्यानो ...
छत्रपती  शिवाजी महाराजांच्या सौभाग्यवती महाराणी राजमाता सईबाई साहेब यांची जन्मभूमीला रक्त रंजित करण्याच्या उद्देशाने फलटण नगर पालिका , धर्मद्रोही - राष्ट्र द्रोही असे आपले राज्यकर्ते आणि प्रशासणातील धर्मद्रोही अधिकारी यांनी फलटण शहरामध्ये अत्याधुनिक कत्तलखाना निर्माण करण्याचे कटकारस्थान रचले आहे .
                                           ज्या भूमी मध्ये हिंदूंचा छत्रपती  राजश्री शिवराय यांच्या सौभाग्यवती महाराणी राजमाता सईबाई साहेब यांचा जन्म झाला . ज्या भूमीमध्ये श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आणि लाखो संत वारकरी दरवर्षी मुक्कामी असतात टी भूमी गोवंशाच्या रक्त व मांसाने अपवित्र करण्याचे सुनियोजित कारस्थान रचले आहे .आम्ही हजारो राष्ट्र व गो भक्तांना बरोबर घेऊन " परमपूज्य श्री श्रद्धेय उदयनाथजी महाराज यांच्या नेतृत्वा खाली दिनांक २० जानेवारी २०१४ रोजी दुपारी १२.०० वाजता फलटण नगरपालिकेवर धडक मोर्चा निघालो आहोत . आता फक्त अपेक्षा आहे गो मातेच्या रक्षणासाठी आपल्या सहभागाची ....जास्तीत जास्त लाखोंच्या संख्येने सहभागी व्हा हि नम्र विनंती ...!
संपर्क :- श्री .गोरक्षनाथजी घाडगे -९९८७७८१०४३
 श्री .अक्षय भोसले :- ८४५१८२२७७२
बंधुनो मोठ्या प्रमाणात शेअर करा . जोक आणि इतर गोष्टी आपण लगेच इतरांना फोरवर्ड करतो किमान तुमचे काही मिनिट्स लागतील पोस्त इतरांपर्यंत पोहचवायला .आपण आपल्या राष्ट्राकरिता किमान इतक तरी सहकार्य तरी करू शकतोच हि नम्र अपेक्षा ,
तुमचा
वारकरी संप्रदाय युवा मंच / गोरक्षक बंधू  .