Thursday 29 May 2014

पाऊले चालती पंढरीची वाट .... अक्षय भोसले

||ज्ञानेशो भगवान विष्णू ||
पाउले चालती पंढरीची वाट ..यंदा आपणहि चला , पहा काय आनंद असतो वारीचा तो !
असो

आपण जर पूर्व इतिहास पाहिला तर आपणास अस पाहिला मिळेल कि माउलींच्या आधी दोन थोर तथा महान व्यक्तींनी प्रतिज्ञा केली होती त्यात प्रथम नाव येत ते महान शिवभक्त रावणजी याचं व तद्नंतर पितामहा भीष्मजी रावणाची अशी प्रतिज्ञा होती कि संपूर्ण लंका सोन्याची करीन मात्र केवळ सात कोटी घरच सोन्याची झाली इतर नाही दुसरी प्रतिज्ञा अशी होती कि सोन्याला सुगंध आणीन मात्र आज तागायत सोन्याला सुंगंध नाही आपणच अस म्हणतो एखादा चांगल काम झाल तर सोने पे सुहागा ..मात्र मुळात सोन्याला आजतगायत सुगंध नाही . तसरी प्रतिज्ञा अशी कि लंके भोवतालचा समुद्र सागर गोड करीन मात्र आज पर्यंत तो खारटच आहे आणि चौथी प्रतिज्ञा  अशी कि स्वर्गात जाण्याकरिता शिडी बनविण पण ते हि नाही होऊ शकल  मात्र रावण महाशयांच्या चारीहि प्रतिज्ञा विफल ठरल्या . आणि आणि पितामहां भीष्म यांनी संपूर्ण पृथ्वी निश्पांडवी करीन अशी प्रतिज्ञा केली मात्र  हि प्रतिज्ञा  चुतरा तो शिरोमणी यांनी होऊ नाही दिल . मात्र माझ्या माऊलीयांनी अशी प्रतिज्ञा केली होती कि
अवघाची संसार सुखाचा करीन | आनंदे भरीन तिन्ही लोक ||१||
जाईन  गे माये तया  पंढरपुरा | भेटेन माहेरा आपुलिया ||२||
आणि ती  सार्थ हि केली
 अशी ज्ञानेश्वरांना पंढरपूरला जाण्याची तीव्र इच्छा झाली . पांडुरंगाची भेट होईल कि नाही , असे वाटयचे . पंढरीराव पाहुणे आमच्या घरी येतील काय ? किंवा आम्हाला तरी त्यांच्याकडे जावयास मिळेल काय ? कोण्या का रितेने होईना , देवाची भेट झाली पाहिजे , हाच ध्यास घेतला . ज्याला त्याला विचारायचे , आम्हास पांडुरंगाचे दर्शन घडेल काय ? एक वेळ तर एक कावला कांव कांव करत असता , तय्लाच विचारू लागले . बहुतेक असा कावला ओरडू लागला तर स्त्रिया म्हणतात , आज कुठला तरी पाहुणा येणार व ज्याचे नाव घेतले असता कावळा उडून जातो , तेव्हा समजावे कि तो पाह्गुना आज येणार आहे , त्याप्रमाणे ज्ञानोबा स्त्रीची भूमिका घेऊन एका मैत्रिणीला म्हणतात .सखे ! तो कावळा काही उडला नाही . तेव्हा माऊली नवस करू लागली . उड उड रे काऊ |  तुझे सोनेने मढिवन पाऊ || दहीभाताची उंडी | लावीन तुझे तोंडी || दुधे भरुनी वाटी | लावीन तुझे ओठी || असे चार पाच नवस केल्यावर कावळा उडाल्याबरोबर ज्ञानोबा म्हणतात , ज्ञानदेव म्हणे जाणिजे ये खुणे | भेटती पंढरीराणे शकून सांगे || या प्रमाणे ज्ञानेश्वारांशी पांडुरंगाच्या भेटीचा ध्यास लागला व मी पंढरपूरला कधी जैन कधी जैन असे झाले व शेवटी पताका घेऊन पंढरीशी जायचेच असा त्यांनी निश्चय केला .
 माझ्या मनाची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी ||
पांडुरंगी मन रंगले | गोविंदाचे गुणी वेधले ||
जस कि आपण आज हि पाहतो माउलींचा अश्व ....
माय माऊली माझी माऊली ....माऊली ...माऊली ...
तुमचा ,
अक्षय भोसले – ८४५१८२२७७२
प्रचारक वारकरी संप्रदाय तथा हिंदू धर्म संस्कृती !