Wednesday 16 July 2014

संत साहित्य आणि विज्ञान - आपली कालगणना

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||



अत्यंत प्राचीन संस्कृती असलेल्या आपल्या या राष्ट्राचा वैज्ञानिक शास्त्र परंपरेचा आपला दिव्य वारसा , एक अमुल्य धरोहर , या विषयी आपणा स्फार्शी काही माहिती नाही . आपली संस्कृती हि उपयोग शून्य , परलोकवादी , आणि काहीशी अध्यात्मिक तत्वांची चर्चा करणारी अशा प्रकारची होती , आहे . असे पाल्याला शिकवले जाते . परंतु हा दृष्टीकोण चूक आहे . आपली संस्कृती त्याग्पूर्ण उपभोग घेत इह - प्र्लोकीचे जीव्न्न समाधानी होण्यासाठी , आदर्श जीवनाची ओळख आणि प्राप्ती करून देण्यास्तही व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय सांगणारी आशी थोर परंपरा आहे , या उपक्रमाद्वारे आपल्या संस्कृतीकडे विशेषता: प्राचीन ग्रंथाकडे , आणि त्यातील वैज्ञानिक माहितीकडे पाहण्याची एक नवीन दृष्टी , एक नवीन आयाम ( Dimension) प्राप्त व्हावी अशी अपेक्षा आहे .
यासाठी आम्ही श्री ज्ञानेश्वरीतील आढळलेल्या काही वैज्ञानिक सिद्धांतांची थोडशी चर्चा या स्थानी करीत आहोत .
आपल्याकडे श्री ज्ञानेश्वरी म्हणजेच श्रीमद भगवदगीतेचे भावार्थ दीपिका प्राचीन मराठी भाषेतील ओवीबद्ध टीका ग्रंथ , हा एक अद्भुत ग्रंथ आहे असे मानले जाते . मुख्यत : अध्यात्मिक , परमार्थिक क्षेत्रातल्या या ग्रंथात विज्ञानाच्या अनेक शाखा मधल्या सिद्धांत संदर्भ आढळतात , कि जे पाश्चिमात्य शास्त्रज्ञ यांच्या बद्दल , आणि त्यांच्या संशोधनाबद्दल संपूर्ण आदर ठेऊनही असे म्हणावेसे वाटते कि आपल्याकडे या सिद्धांतांची माहिती फार प्राचीन काळा पासून चालत आलेली होती . अशा काही गोष्टी आपल्या पुढे मांडण्याचा हा प्रयत्न आहे .
श्रीमद्भगवत गीता किंवा ज्ञानेश्वरी या ग्रंथांचे श्रेष्ठत्व , महात्म्य हा एक स्वतंत्र्य विषय होऊ शकेल , तथापि अगदी थोडक्यात सांगयचे तर ' नेमक काय करावे ' हे न समजणारा , गोंधळलेला अर्जुन हा आपणासारख्याच सर्वसामन्य माणसांचा प्रतिनिधी आहे , आपल्यापुढे अशा प्रकारची किंकर्तव्यविमूढ अवस्था अनेकवेळा असते . भ्रांतचित्त अशा अर्जुनाबरोबर भगवान श्रीकृष्ण समरांगणावर जी दिव्य चर्चा केली , जिचे संपादन महर्षी व्यास यांनी महाभारतात केले , ती म्हणजे श्रीमद्भगवत गीता . या गीतेमधील त्त्वज्ञानामुळे अर्जुनाचा वैचार्क गोंधळ संपला , आणि तो ' करिष्ये वचनं त्व ' असा निश्चय करून भगवत कार्य म्हणून केलेल्या महा संग्रामात विजयी झाला .
अत्यंत अर्थगर्भ असलेली संस्कृत भाषेतील हि गीता जनसामन्य यांना समजावी यासाठी श्री ज्ञानेश्वर महाराजांनी गीतेचा भावार्थ प्राकृत अशा मराठी भाषेत ओविरुपात सांगितला . या ज्ञानेश्वरीचा मुख्य विषय जरी भगवतगीतेचा भावार्थ असला तरी त्याच्या अनुषंगाने विविध वैज्ञानिक सिद्धांत प्रगट दिसतात , त्याकडे माही जिज्ञासूंचे लक्ष वेधू इच्छितो .
हे वैज्ञानिक संदर्भ श्री ज्ञानदेवांना माहित होते असे म्हणणे आमच्या औध्दत्याचा भाग ठरू शकतो . कारण श्री ज्ञानदेव तर "ज्ञानियांचा राजा गुरु महाराव " असे जगद्गुरू श्री तुकोबाराय म्हणतात , त्यांना अज्ञात असे काही नसणारच , परंतु आम्हाला इथे म्हण्याचे आहे कि , हे वैज्ञानिक संदर्भ श्री ज्ञानदेवांच्या श्रोते यांना हि परिचित होते . कारण हे सगळे संदर्भ उपमेच्या स्वरूपात आढळतात . आणि अपरिचित गोष्टींची उपमा उपयोगाची नसते , उपमा हि परिचित गोष्टींची असली पाहिजे हे अगदी स्पष्ट आहे .
सर्व प्रथम आपण श्री ज्ञानदेवांच्या काळाचा विचार करू , ग्रंथाचा समारोप करताना अस लिखाण उपलब्ध आहे कि ,
शके बाराशते बारोत्तरे | तैं टीका केली ज्ञानेश्वरें |..... ( ज्ञानेश्वरी अध्याय १८ / १८१० )
शके १२१२ म्हणजे युगाब्ध ४३९२ . सामन्यपणे इसवीसन १२९० . याचा विचार करण्याचे कारण म्हणजे पाश्चात्य शास्त्रज्ञानांचा काल आणि श्री ज्ञानेश्वरी काल यानाचा तौलनिक विचार केला पाहिजे . ' निकोलस कोपर्निकस ' , ज्यांचा जन्म इ.सन.१४७३ चा त्यांचे संशोधन ' कोमेंट्रीऑल्स ' सन १५३३ मध्ये किंवा ' रीव्होल्यूशनिबस ' हा ग्रंथ इ.सन.१५४३ मधला . श्री ज्ञानेश्वरी नंतर सुमारे २४३ वर्ष ' योहान केप्लर ' जन्म इ.सन. १५७१ यांचेच समकालीन ' गलिलिओ ' , ज्यांनी पृथ्वी फिरते असे संगीतले त्यांचा कालावधी श्री ज्ञानेश्वरी नंतर २८१ वर्षे , गुरुत्व आकर्षण सिद्धांत मांडणारे ' आयझक न्यूटन ' ज्यांचा सिद्धांताचा ग्रंथ " प्रींकपिया " प्रकाशित झाला , त्याचा कालावधी इ.सन.१६६६ ते १६८५ म्हणजे श्री ज्ञानेश्वरी नंतर ३७६ वर्षे . ' अल्बर्ट आईन्स्टाइन ' यांनी विविक्षित सापेक्षता सिद्धांत ( Special Relativity ) सांगितला इ.सन.१९०५ मध्ये आणि व्यापक सापेक्षता ( General Relativity ) सिद्धांत सांगितला इ.सन.१९१५ मध्ये . हा कालावधी "श्री ज्ञानेश्वरी "नंतर ६१५ वर्षे .
आजकाल २१ व्या शतकाच्या गोष्टी केल्या जातात , पण आपण विसरलो आहोत आपले कलियुगाचे ५२ वे शतक चालू आहे . कालमापनाची आपली प्रचीत पद्धत शालिवाहन शक नाही . युगांची वर्षे अर्थात युगाब्द मोजण्याची आपली पद्धती आहे . चार युगांचे एक युगचतुष्क म्हणजे मानवी ४३ लक्ष २० सहस्त्र वर्षे . ज्यातील चार युगांची वर्षे पुढील प्रमाणे आहेत , पहिले कृतयुग १७,२८,००० वर्षे . दुसरे त्रेतायुग १२,९६,००० वर्षे , द्वापारयुग ८,६४,००० वर्षे आणि चवथे कलियुग ४,३२,००० वर्षे , या आपल्या गणनेप्रमाणे कलियुगाचे ५१०७ वे वर्ष चालू आएह ,कालमापनाची व्याप्ती केवढी आहे , हे जाताजाता लक्षात घ्या , आपल्याकडे एक परमाणु म्हणजे सामान्यत : १.०९७४ * १०'-५ सेकंद इथपासून आदिशक्तीचे आयुष्य ३.७६०५*१०'५३ पर्यंत विचार उपलब्ध आहे म्हणजे जवळपास ५८ दशमस्थानंचा विचार उपलब्ध आहे , अशा अत्यंत प्राचीन परंपरेचा वारसा असणारे आपण आहोत , आजची युवा शक्ती एकत्र आली पाहिजे आपल्या संत साहित्यात जितक ज्ञान आहे तितक जागच्या पाठीवर कुठेच उपलब्ध नाही .
तळमळ इतकीच कि आपण सर्वांनी आपल संत साहित्य वाचल पाहिजे
मुळात हे सर्व " श्री ज्ञानेश्वरीतील विज्ञान दर्शन अर्थात वैज्ञानिक सिद्धांताचे संदर्भ "
आदरणीय नीलकण्ठ अनन्त आठवले जी
श्री वरदानंद भारती प्रतिष्ठान , श्री क्षेत्र पंढरपूर आणि असंख्य संत साहित्य गाढे अभ्यासक यांच्या पुस्तकात उपलब्ध आहे मात्र ते आजतागायत अनेकांपर्यंत पोहचल नाही कारण ते पुस्तक जे वाचेल त्यांच्या पर्यंत फक्त पोहचत मात्र तेच अद्भुत रहस्य आपणा पर्यंत जाव हे आमच कर्तव्य सामझतो म्हणून सर्व पुनश्च इंटरनेट च्यामाध्य्मातून संकलन करीत आहोत , सर्व टाईप करण्याकरिता बराच वेळ जातो मात्र माऊली कृपेने नवीन काही कार्य करण्यास प्रोत्साहन मिळते . आमचे हे प्रयत्न आणि कष्ट आपणापर्यंत जावेत व आपण हि संत साहित्य वाचव शक्य असल्यास जास्तीत जास्त आपल्या मित्र परिवारापर्यंत हि माहिती नक्कीच शेअर कराल हि अपेक्षा आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा , लवकरच नवीन सिद्धांतासोबत भेटूयात .
आपला
अक्षय भोसले - ८४५१८२२७७२ 
वारकरी संप्रदाय युवा मंच , महाराष्ट्र