Monday 19 December 2016

श्री मोरारी बापू यांचा हितोपदेश ! - जयश्री पाटील

नामस्मरण, शरणागती, आणि भगवत्प्राप्ती -
भगवत्प्राप्तीला शरणागतीशिवाय मार्ग नाही, आणि शरणागती म्हणजे, 'मी कर्ता ' हा अभिमान नाहीसा होऊन, 'सर्व कर्तृत्व परमेश्वराचे आहे' ही दृढ भावना होणे. नामाशिवाय इतर साधनांत 'कृती' आहे; म्हणजे 'मी कर्ता ' या अहंकाराला वाव आहे. स्मरण हा मनाचा धर्म असल्याने त्यात कृतीचा प्रश्नच येत नाही, म्हणून त्यात अहंकाराला वाव नाही; शिवाय, स्मरण किंवा विस्मरण या दोन्ही गोष्टी आपल्या हातात नाहीत; म्हणून नामाचे स्मरण झाले तरी त्यात स्वतःचे कर्तुत्व नसते, त्यामुळे 'मी कर्ता ' ही जाणीव टिकू शकत नाही. 'मी नामस्मरण करतो' हा शब्दप्रयोगसुद्धा बरोबर नाही, कारण नामाचे स्मरण 'होत असते,' ते 'करू' म्हणून जमत नाही. म्हणून शरणागतीला नामस्मरणासारखे दुसरे साधन नाही.

युवा पिढीकरिता विशेष ते सांगतात की,  जीवनाचा आनंद घ्या प्रामाणिक रहा, भरपूर शिका, मंगल काव्यांचं गायन करा आणि हे करत करत रात्री घरी गेल्यानंतर सर्व काम झालं तर आता फक्त झोपायचं आहे तदपूर्वी तेव्हा फक्त काही वेळ हरीच स्मरण करा .

शरणागतीचा दुसरा अर्थ म्हणजे कायिक, वाचिक आणि मानसिक क्रिया थांबविणे. क्रिया न करणे हे कृती करण्यापेक्षा केव्हाही जास्त सोपे आहे; म्हणजेच शरणागती ही सहज साध्य वाटली पाहिजे. देहबुद्धी गेल्याशिवाय शरणागती येत नाही. देहबुद्धी, वासना, अहंकार, ही सर्व एकच आहेत. जगातल्या वैभवाची आसक्ती आणि परमात्मप्राप्ती, या दोन्ही गोष्टी एकत्र असूच शकत नाहीत. म्हणूनच उद्धवाला श्रीकृष्णांनी एकांतात जाऊन हरिचिंतन करायला सांगितले, आणि असे केल्यानेच माझी तुला खरी प्राप्ती होईल असे म्हणाले. याचा अर्थ हाच की, जगाकडे पाठ फिरविल्याशिवाय भगवंत मिळत नाही.  भगवंत हा अत्यंत सूक्ष्म असल्यामुळे, त्याची प्राप्ती करून घेणे म्हणजे जडाकडून सूक्ष्माकडे जाणे होय. तेव्हा त्याचे साधन हेही जडाकडून सूक्ष्माकडे पोहोचविणारे असले पाहिजे. जड देहाशी संबंधित आणि सूक्ष्माशी निकट चिकटलेले असे साधन असेल तर ते नामच होय.

- प पू श्री मोरारजी बापू . राम कथा, ठाणे ( पश्चिम ).
|| श्री राम जय राम जय जय राम || || श्री राम जय राम जय जय राम ||

©जयश्री पाटील
वारकरी संप्रदाय , महाराष्ट्र