Friday 27 January 2017

गुरूबंधू म्हणजे काय ?


जन्माला येणारा प्रत्येकाला एक दिवस जावेच लागते. म्हणून जन्माला येणार्‍या व्यक्तीला जातक असे संबोधले जाते. आत्मा जन्म घेत नाही तर शरीर जन्म घेते. म्हणजे जन्माला आलेले ते शरीर केव्हा तरी मरणारच. खरी गंमत येथेच आहे. कारण  आत्मदेव तर ब्रम्हज्ञानी आहे. तरी पण देहातून मृत्यु समयी बाहेर पडलेला आत्मा पुन्हा एखाद्या गर्भातुन प्रसुत होई पर्यंत ब्रम्हज्ञानी असतो. आणि सतत चिंतन करित असतो. हे ज्ञान असून सुध्दा मी पुनरपि जन्म  पुनरपी मरणम चक्रात का अडकतो ? तरी या जन्मात मी माझ्या जवळील ज्ञानाचा उपयोग करून याच्यातून मुक्त होईल आणी ब्रम्हपदाची  प्राप्ती करून घेईल. असे विचार स्थिर होत असताना ती दिव्य प्रसुतिची वेळ समोर येते त्या आत्मदेवाला ही  मोठी संधी वाटते परंतु प्रसुति नंतर त्या जातकाच्या टाळूला मृत्यु लोकीचा वायु स्पर्श करतो आणि जवळ असलेले ज्ञान विस्मृतीत जाते. आणि जातक रडायला लागते.

आता पुन्हा शुन्यापासून जीवन प्रवास सुरू झाला. तरी पण त्याची कुंडलीनी जागृत अवस्थेत वयाच्या ८व्या वर्षपर्यंत असते.याच वेळेला किंवा येथून पूढील प्रवासासाठी
सद्गुरुंकडून मिळालेला अनुग्रह जसे मंत्रदीक्षा, स्पर्शदीक्षा, ध्यानयोगदीक्षा,  शांभवि दीक्षा हा त्या व्यक्तीचा नूतन जन्म मानला आहे. आणी  सद्गुरु म्हणजे "त्वमेव माताच पितात्वमेव" या न्यायाने आपले सद्गुरू आपले माता पिता बंधु सखा होतात आणि आपला अध्यात्मिक परिवार तयार होतो. आपल्या सद्गुरुंनी दिलेले सर्व अनुग्रहित हे आपले बंधू भगिनी होत. कारण प्रत्येकची गुरूमाउली एकच आहे आणि त्या माउलीला प्रत्येकाला बोटला धरून ब्रम्हज्ञानाच्या अवस्थेकडे आपल्या या लेकराला न्यायचे असते किंबहुना याचसाठी हे सर्व घडत असते.
गुरूबंधु म्हणजे सद्गुरुंच्या तत्वांपाशी जो आबध्द होतो किंवा सद्गुरुंच्या दर्शित मार्गामधे जो बांधला जातो म्हणजेच स्वतःला विसरून जातो आणि गुरुमय होण्याची ज्याची धडपड आहे. गुरूपरिवाराला काहितरी वेगळे देण्याची ज्याची तयारी असते. त्यांना गुरुबंधु असे एकमेकात
संबोधले जाते. बंधु किंवा भगिनी या शब्दांच्या मुळाशी परम सात्वीक भाव उत्पन्न होतात. आदरणीय विवेकानंदांनी या दोन शब्दावर शिकागो परिषद जिंकली होती म्हणून एकाच गुरूंच्या अनेक शिष्यामधे जे अदृश्य सत्व भाव भावनांचे जाळे विणले जाते सत्व वृत्तीकडे धावायला लागते त्यां नात्याला गुरुबंधु असे समजतात.