Sunday 19 June 2016

वृक्ष नोहे वङ पिपंळ


|| ज्ञानेशो भगवान विष्णु : ||

राम रावणाच्या युद्धात रावणाचा मृत्यू झालेवर त्याचे दहाही शिर एकदम शरीरावरून उसळली व प्रभुच्या सभोवती फिरून त्रास देऊ लागली
प्रभुने ते सर्वही शिरे मंत्रबलाने जाळून टाकली व प्रजाजनास मौन धारण करण्यास सांगितले
प्रजा त्या राज आदेशाप्रमाने वागूही लागली
परंतू मौनामुळे यज्ञयाग सर्व बदं पङले
शेवटी अयोध्येतून रूषिवर ब्रम्हवृदं बाहेर पडले
शेवटी हे वर्तमान महर्षी नारदानी इद्रंदेवाला कळविले
इद्रंदेव नारदजी बरोबर ब्रम्हं विष्णू महेश तिनही देवाकडे गेले
भगवान शकंरानी ब्रम्हदेवाला अयोध्येत अश्वस्थ ( पिपंळ) वृक्षाचे रूप धारण करायला लावले
व मोठय़ाने वेदघोष सुरू करायला सागितंले
ब्रम्हंदेव शकंरजीना म्हणाले
मी वृक्ष होतो पन स्वाभाविकच लोक माझ्यावर कुर्‍हाडीचे घाव घालतीलच
देह स्वभावाप्रमाने पानेही तोङतील
तेव्हा महादेव म्हणाले


जो तुजवर घाव घालील त्याला ब्रम्हंहत्येचे पातक होईल
आणि याकङे दुर्लक्ष करून जो कोनी घाव घालील ते पहीले तिन आघात मी सहन करील
व भगवान विष्णूही तिन घाव सहन करतील
हे ऐकुन इंद्रादी देव देवताही इतर वृक्ष व वनस्पती होऊन ब्रम्हंदेवाला साह्य करू लागल्या
माऊली ज्ञानोबाराय सुद्धा
वर्णन करतात
महावने लावावी ! नानाविध !!
तुकोबाराय तर म्हणतात
वृक्ष नोहे वङ पिपंळ !
श्रेष्ठ तनू देवाचिया !!
म्हणून तर तुकोबारायही म्हणतात
वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी
उद्या वटसावित्री पौर्णिमा
वटपुजेचा मगंल दिन
फक्त
हिदुं धर्माच्या मायबहिनीनां पुज्य असलेल्या पवित्र सनावारावर पाचंट विनोद नसावे
हिच अपेक्षा
जय मुक्ताई👏🏻


- varkariyuva.blogspot.in