Wednesday 16 March 2016

कर्म - श्रीगुरू ह.भ.प. चैतन्यमहाराज देगलूरकर


माणूस कर्माशिवाय राहू शकत नाही.त्याला कर्म करावीच लागतात.जोपर्यंत शरीर आणि प्राणसंबंध आहे, तोपर्यंत त्याला कर्म आहेतच.ते कर्म तो टाऴू शकत नाही. ' नहि कश्चित् क्षणमपि जातु तिष्ठत्यकर्मकृत् ' असे स्वत : भगवानच सांगतात.या श्लोकावरील भाष्यात श्रीज्ञानेश्वर महाराज म्हणतात -
म्हणऊनि संगजव प्रकृतीचा । त्याग न घडे कर्माचा । ऐसियाहि करू म्हणती तयांचा । आग्रहोचि उरे ।।
म्हणजे कर्म हे जिवाला करावेच लागते. कर्म म्हटले की त्याचे फऴ आहे.ते कर्माला अनुसरूनच येते.जर कर्म चांगले असेल तर फऴ चांगलेच असणार.
कर्म आणि कर्म फऴाचा संबंध तोडणे शक्य नाही.
' यादृशं करूते कर्म तादृशं फलमश्नुते ।'
असे रामायणात म्हटले आहे. कर्म करावेच लागते आहे आणि त्याप्रमाणे जर फऴ मिऴतेच आहे, तर माणसाने चांगले कर्म का करू नये? शहाणा मनुष्य कृती करताना परिणामाचा विचार करून करतो.फऴ काय,त्याची आवश्यकता काय, त्याची शक्यता किती, ते योग्य का , वगैरे अनेक गोष्टींचा विचार त्याला करावा लागतो. कारण कर्म आणि कर्मफऴ यातील अंतर जसे वाढत जाते, तशी कर्मफऴाची तीव्रता वाढत जाते.म्हणूनच माणसाने असे कर्म करावे, की ज्यामुऴे त्याला समाधान होईल, कल्याण होईल.श्रीतुकाराम महाराज म्हणूनच सांगतात,
ऐसे का हो न करा कांही ।
पुढे नाही नाश ज्या ।।
असे माणसाने करावे की ज्याला पुढे नाश नाही.जे स्वत:ही नष्ट होत नाही आणि इतरही कोणी त्याला नष्ट करू शकत नाही. महाभारत म्हणते ;
यदन्येशां हितं न स्यादात्मन: कर्म पौरूषम ।
अपत्रपेत वा येन न तत्कुर्यात्कथंचन ।।
आपली जी कृती एकचशद् आहे होणार नाही किंवा जे केल्याने आपली आपल्यालाच लाज वाटेल असे वागू नये.म्हणजे स्वार्थासाठी वाट्टेल ते करू नये.उलट परोपकाराने जगण्याचे सार्थक झाले,असेच वाटले पाहिजे.थोडक्यात , त्याप्रमाणे तो नष्ट होणाराही परहिताचाही विचार आहे आणि त्याने लाजही वाटत नाही.त्याप्रमाणे तो नष्ट होणाराही नाही. म्हणून तेच करणे योग्य आहे.
।।राम कृष्ण हरी ।।
संदर्भ - संतसंग
© ह.भ.प.श्री.चैतन्य महाराज देगलूरकर.