Thursday 10 September 2015

शिवधनुष्याची तपश्‍चर्या राम-सीता स्वयंवराला कारण - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

 || श्रीगुरू ||
ज्यावेळेस विश्‍वामित्र ऋषी प्रभुरामचंद्राला घेऊन निघू लागले तेव्हा राजा दशरथ म्हणू लागले की, तुम्ही माझा आत्माच घेऊन चालला आहात. यावरुन दशरथाचे रामावर किती प्रेम होते हे दिसून येते. त्यानंतर राम तिथून मिथिला नगरीला गेले असता झालेल्या सीता स्वयंवरामध्ये जनक राजाचे शिवधनुष्य प्रभुरामचंद्रानेच उचलावे यासाठी शिवधनुष्यानेच केलेली तपश्‍चर्या राम-सीता स्वयंवराचे कारण झाले असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले.
बाश्री येथील भगवंत मंदिरात श्रावणमासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. बोधले महाराज म्हणाले, विश्‍वामित्र राम-लक्ष्मणाला घेऊन जात असताना जाताना त्यांनी कृतिकेचा वध केला होता. हा यज्ञ, हा दिवस सुरु होता त्याकाळात विश्‍वामित्राचे पूर्ण मौन होते. यज्ञाच्या काळात रामाने मारिच व सुबाहू या दोन राक्षसांचा वध या दोन बंधूंनी केल्याचे महाराज म्हणाले. त्यानंतर विश्‍वामित्र या दोघांना घेऊन मिथिला नगरीला आले. मिथिला नगरीचा राजा सिरध्वज हे त्याचे मूळ नाव होते तर जनक ही एक पदवी होती. राजा जनक व त्याची पत्नी सुनयना या दोघांना जमीन नांगरत असताना एका पेटीत सीता सापडली होती. जनकाला कुशध्वज हा एक भाऊ होता. जनकाचे गुरु शांतानंद मुनी म्हणजेच गौतम ऋषी व अहिल्येचे पुत्र हे होते. या जनक राजाकडे एक शिवधनुष्य होते. आणि हे शिवधनुष्य अत्यंत अवजड होते. परंतु सीतेने एकदा ते सहजरित्या उचलले होते. म्हणून जनकाने त्यावेळी प्रतिज्ञा केली होती की, जो कोणी हे शिवधनुष्य उचलेल व त्याला बाण लावेल त्याच्या गळ्यात सीता वरमाला घालेल. ज्यावेळेस राम-लक्ष्मणाला घेऊन विश्‍वामित्र मिथिलेला आले होते तेव्हा स्वयंवराची तयारी सुरू होती. त्यासाठी भूतलावरचे अनेक राजे आले होते. त्यामध्ये रावण देखील होता.हे कोणाला उचलू नये म्हणून सीतेनेच देवांना त्यात बसण्याची विनंती केली होती. हे शिवधनुष्य उचलताना रावणासहित अनेक राजांची फजिती झाली होती. प्रभुराम हे सर्व पाहत होते.परंतु विश्‍वामित्राची आज्ञा नसल्यामुळे ते स्वत:हून उटले नव्हते. ज्यावेळी ते उटले तेव्हा सगळ्यांना नमस्कार करुन शिवधनुष्य उचलताना त्याला देखील आनंद झाला होता. मात्र रामाने ते उचलून त्याला बाण लावला व सीतेने हार गळ्यात घातल्यानंतर हे स्वयंवर संपले. त्यानंतर जनकाची दुसरी कन्या लक्ष्मणाला तर जनकाचा भाऊ कुशध्वजाच्या कन्या मांडवी व श्रुतकीर्ती या अनुक्रमे भरत व शत्रुघ्नाला दिल्याचे महाराजांनी सांगितले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२