Tuesday 28 March 2017

ह.भ.प.वै. पांडुरंग ज्ञानेश्वर कुलकर्णी तथा पांडुरंग शास्त्री शर्मा चऱ्होलीकर (सचिव)

वेदशास्त्रसंपन्न पांडुरंग शर्मा यांचा संस्थेच्या स्थापने मध्ये सिंहाचावाटा होता. हे संस्थेचे दि. २४ मार्च १९१७ ते दि. २ फेब्रुवारी १९२३ असे पाच वर्षे अकरा महिने संस्थेचे पहिले संस्थापक सचिव होते. पूर्वी संस्थेत एकाचवेळी दोन सचिव असत त्यात एक कार्यालयीन सचिव व दुसरा कार्यालयबाह्य लोकसंपर्क इत्यादी कार्यसचिव याच प्रमाणे संस्थेत एक अध्यक्ष, दोन उपाध्यक्ष व एक खजिनदार असे सहा पदाधिकारी व पाच सभासद असे अकरा लोकांचे कार्यकारी मंडळ असे. विशेष सभेच्या आजीव सभासदानाही संख्येची मर्यादा नव्हती. अशा संस्थेच्या प्रथम घटनेच्या रचनेमध्ये पांडुरंग शास्त्री शर्मा यांची मुख्य भूमिका होती. परंतु ३१ ऑक्टोबर १९५२ साली झालेल्या घटना दुरुस्ती नुसार एक अध्यक्ष, एक सचिव व पाच विश्वस्त अशा सात लोकांच्या कार्यकारी मंडळाची रचना मंजूर करण्यात आली. या संकोचित घटनादुरुस्तीमुळे संस्थेच्या कार्याविस्तारावर व दैनंदिन कारभाराच्या पारदर्शकतेवर विपरीत परिणाम झाला तो सर्व विदित आहे.
वेदशास्त्रसंपन्न पांडुरंग शास्त्री कुलकर्णी, चऱ्होली बु. पुणे, हे वाराणसी येथे शास्त्राध्यन करून वारकरी शिक्षण संस्थेत शिक्षक ,श्री सद्गुरू जोगमहाराज यांचे साक्षात अनुग्रहित, आळंदी नगरपरिषदेचे नगराध्यक्ष ,श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे अध्यक्ष , जिल्हा लोकल बोर्डाचे सदस्य, लेजीस्लेतीव कौसील मुंबईचे सदस्य, सर्वशास्त्र पारंगत, चिद्विलासवादाचे विशुद्ध प्रतिपादक, चांगदेव पासष्टीवर स्वानंदजीवन नामक शास्त्रशुद्ध चिद्विलासवादाचे लेखक, प्रतिभासंपन्न संशोधक, विचारवंत प्रकांड विद्वान होते. आणि त्यांचे गुरुनिष्ठनिर्मल जीवन सदैव प्रेरणादायी होते व आहे.

साभार - वारकरी शिक्षण संस्था