Sunday 15 December 2013

भोंदू लोकां विषयीच परखड मत तुकोबाराय मांडतात आपल्या अभंगातून...

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
भोंदू लोकां विषयीच परखड मत तुकोबाराय मांडतात आपल्या अभंगातून ... “भगव्या वस्त्रावरूनच एखाद्याला साधू म्हणायचे तर कुत्र्याचा रंगही 

भगवाच असतो.” 
“केवळ जटा वाढवल्या, दाढी राखली म्हणजे कुणी साधू होत नसतो
तसे असते तर मग केसाळ शेपटी असणार्र्या कोल्ह्यालाही साधू 
म्हणणे भाग पडेल.”
“एखाद्याने डोंगरात गुहा तयार करून त्या ठिकाणी वास्तव केले,
म्हणजे तो काही साधू होत नाही. तसे झाले तर मग गुहेत, 
बिळात राहणार्र्या उंदराला सुद्धा साधुत्वाची पदवी द्यावी लागेल.”
वरवर साधुत्वाची लक्षणे धारण करून साधुत्वाचा आव आणणार्र्या
भोंदूला साधुसंत समजणे चुकीचे आहे .
आणि मुळात मुद्दा हा आहे कि वारकरी या कायद्याला वरोध करतात मात्र आपणास आम्ही सांगू इच्छितो कि आम्ही संत वचनावर विश्वास ठेवतो , जस कि तुकाराम महराजांनी सांगितल कि वरील अभंगात कि जे भोंदू आहेत अशा भोंदू बाबा बुवा करिता हा कायदा आहे . वारकरी संप्रदायात अशा लोकांना स्थान नाही हे आम्ही हि म्हणतोच मात्र आमच्या आधी आमचे तुकोबाराय म्हणतात आपल्या अभंगा तून कि हे सर्व खोटेपणा आहे , आणि मुळात जे वारकरी आहे त्यांनी घाबरायचं कारणच उरत नाही , त्यामुळे वारकरी याला विरोध कस काय करू शकतील आणि जे करतील ते ???.........तुम्हाला अस वाटल मी पुढे काही बोलीन अहो समझुन जा आपण सुज्ञान आहात .......अहो वेळ आली तर भले तर देऊ कासेची लंगोटी , नाठाळाच्या माथी हनु काठी असा संप्रदाय आहे त्यांना पाठीशी घालणारा नाही बस इतकच ...सर्व वारकरी वर्गाने याला नक्कीच जास्तीत जास्त पाठिंबा द्यावा ....
आपला कृपाभिलाषी ,
अक्षय भोसले .