Sunday 15 December 2013

जादू टोणा विधेयकाला वारकरी संप्रदायाचा विरोध असल्याचा अभास निर्माण केला जातोय .

|| ज्ञानेशो भगवान विष्णू ||
जादू टोणा विधेयकाला वारकरी संप्रदायाचा विरोध असल्याचा अभास निर्माण केला जातोय . 

सातशे वर्षांपूर्वी नामदेव, ज्ञानदेवांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचा जागर सुरू केला. समतेची चळवळ अभारली असा वारकरी संप्रदाय या विधेयकाला विरोध करू शकत नाही. जे ज्ञानोबा-तुकोबांच्या विचारांना विरोध करतात ते वारकरी असू शकत नाही . यालाच प्रमाणभूत विधेयकातील प्रत्येक कलमाला अनुसरून त्यास संतांच्या अभंगाचे प्रमाण आपल्या पुढे सादर करतोय ....कारण हा कायदा म्हणजे संतानी मांडलेल्या विचारांचा विजय आहे . बोला `पुंडलिक वरदे हरी विठ्ठल' श्री ज्ञानदेव तुकाराम , पंढरीनाथ महाराज कि जय . सब संतन कि जय ..!
अशा व्यक्त करतो कि आपण सर्व वारकरी गुरुवर्य बंधू भगिनी ज्येष्ठ विचारवंत यास पाठिंबा द्याल ...
तुमचा ,
अक्षय भोसले .