Friday 28 August 2015

ह.भ.प. जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले यांच्या अमृतमय वाणीतून " अध्यात्म रामायण " भगवंत बार्शी मंदिर , बार्शी येथे

|| श्रीगुरू ||
ह.भ.प. जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले यांच्या अमृतमय वाणीतून " अध्यात्म रामायण " बार्शी येथे

भगवंत मंदिर बार्शी येथे  प्रवचनमाला सुरू
         श्रावण मासानिमित्त बाश्रीच्या भगवंत देवस्थान समिती व बोधराज भक्तमंडळातर्फे ह. भ. प. जयवंत महाराज बोधले यांच्या १३ व्या वर्षीच्या प्रवचनमालेचा शुभांरभ भगवंत मंदिरात पश्‍चिम महाराष्ट्र विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांच्या हस्ते गं्रथपूजनाने करण्यात आला.
या प्रवचनमालेतील पहिल्या दिवशी अध्यात्म रामायण यावर निरूपण करताना जयवंत बोधले महाराजांनी श्रावण महिन्याचे महत्त्व सांगितले. अध्यात्म रामायणात सात कांड, ६५ अध्याय, त्यात ४३९९ श्लोक असल्याचे सांगून त्याचे चिंतन होण्यासाठी हा श्रवणसुखाचा सोहळा आहे, असे ते म्हणाले.
उल्हास पवार म्हणाले, जीवनातील आसक्ती व मृत्यूचे भय घालविण्याचे सार्मथ्य अध्यात्मात असल्याने आजच्या युवा पिढीने श्रावण मासानिमित्त सुरू झालेल्या प्रवचनमालेतील धार्मिक संस्काराचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
प्रास्ताविकात विलास जगदाळे म्हणाले, भगवंत मंदिरात गेल्या १२ वर्षांपासून विविध विषयांवर माणकोजी बोधले महाराज यांचे ११ वे वंशज जयवंत महाराज यांची ही प्रवचनमाला महिनाभर सुरू असते.
याप्रसंगी ह. भ. प. जयवंत महाराज बोधले यांचा सत्कार सरपंच दादा बुडूख यांच्या हस्ते केला. त्यानंतर देगलूरकर महाराजांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले 
८४५१८२२७७२