Friday 28 August 2015

भगवंताचा अवतार कर्मबंधनातुन मुक्त करणारा - ह.भ.प.जयवंतमहाराज प्रभाकरदादा बोधले

|| श्रीगुरू ||
भगवंताच्या अवताराचे अंश, अशांश, कला, आवेश, पूर्ण आणि पूर्णतम हे सहा प्रकार असून भगवंताच्या दशावतारामध्ये प्रभू रामचंद्र व श्रीकृष्ण अवतार हे दोनच अवतार पूर्ण अवतार आहेत. जे भगवंताला, अवताराला व जे त्यांना जाणतात या दोघांनाही कर्माचे बंधन नसते, नव्हे तर भगवंताचा अवतार हा कर्मबंधनातून मुक्त करणारा असल्याचे प्रतिपादन ह.भ.प. अँड. जयवंत बोधले महाराज यांनी केले. 

श्री भगवंत मंदिरात श्रावण मासानिमित्त बोधराज भक्तमंडळ व भगवंत देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या अध्यात्म रामायण या विषयावरील प्रवचनमालेत ते बोलत होते. भगवंत अवताराला येतो म्हणजे तो जन्माला येतो. सामान्यांचा जन्म हा वासनेनुसार आहे, पण भगवंताचा अवतार हा वासनेच्या आहारी नाही. सामान्यांचा जन्म असला तर भगवंताचे प्रकटीकरण आहे. सामान्य माणसाला मरताना जी इच्छा असते त्यानुसार त्याला पुढे जन्म मिळत असतो. भगवंत मात्र भक्ताकरिता अवताराला येतात. सामान्य माणसाला जन्माला यावेच लागते, संत हे स्वत:हून येत असतात आणि देवाला मात्र हाक मारून आणावे लागते, असे महाराज म्हणाले. चैत्र शुद्ध नवमीला सोमवारी व पुनर्वसू नक्षत्रामध्ये प्रभू रामचंद्र अवताराला आले. हा अवतार सूर्यवंशाचा असल्यामुळे सूर्य हा देखील अत्यंत आनंदात होता. ज्यावेळी भगवंत कौशल्या मातेच्या पोटात होते तेव्हा ती स्वानंद स्थितीत होती. राजा दशरथाने वशिष्ठ ऋषीला हे काय चालले आहे असे विचारले असता वशिष्ठाने भगवान तुमच्या घरात अवताराला येणार असल्यामुळे सूर्यकुळाला चांगले दिवस येणार आहेत, असे सांगितले होते. त्यामुळे राजा दशरथ देखील खूप आनंदी झाले होते व ते देखील विदेह स्थितीत नाचू लागले होते. प्रभू रामाचा जन्म झाला तेव्हा त्यांच्या कुंडलीतील गृह देखील स्वत: उच्च स्थानावर जाऊन बसले होते. सामान्यांचा जन्म असला तर भगवंताचे प्रकटीकरण आहे. सामान्य माणसाला मरताना जी इच्छा असते त्यानुसार त्याला पुढे जन्म मिळत असतोच असेही बोधले महाराज यांनी सांगितले.
( साभार  दैनिक लोकमत )-
आपला  
अक्षय चंद्रकांत भोसले